आदित्य ठाकरे खोटं बोलतात, त्याचं तोंड विना फेव्हिकॉलचं बंद होणार, आदित्य ठाकरेंवर या नेत्यांनी साधला निशाणा

दांता प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे राज्याबाहेर गेला असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे खोटं बोलतात, त्याचं तोंड विना फेव्हिकॉलचं बंद होणार, आदित्य ठाकरेंवर या नेत्यांनी साधला निशाणा
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 7:22 PM

मुंबईः वेदांता प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना आव्हान देत आपल्यासोबत वेदांतावरून डिबेट करा असं जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खोटं बोलत आहे असा आरोप भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वेदांता प्रकरणावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.

ठाकरेंवर टीका करताना आमदार आदित्य ठाकरे खोटं बोलतात अशी थेट टीका केली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आदित्य ठाकरे यांनी जर पुरावे दिले नाही तर आदित्य ठाकरे यांचे तोंड विनाफेव्हिकॉलचं बंद होई असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेदांता प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित करावा आणि जर सरकारने जर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.

तर मात्र सरकारचं तोंड बंद होईल आणि उत्तर दिले गेले तर आदित्य ठाकरे यांचे तोंड विना फेव्हिकॉल बंद होईल असंही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका करताना त्यांनी ठाकरे गट आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सरकारवर खोटेनाटे आरोप करत आहे असा आरोप केला आहे.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातच गेले नाहीत. त्यामुळे वेदांताविषयी चर्चा कोणाबरोबर करणार असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

मागच्या सरकारच्या काळात वेदांता प्रकल्पासाठी कुठेही जागा मिळाली नाही, त्यांच्याबाबत कुठेही बैठका झाल्या नाहीत, वेदांता प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे राज्याबाहेर गेला आहे.

त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयात गेले नाहीत, त्यामुळे कोणाबरोबर बैठका घ्यायच्या हा प्रश्न होता. आदित्या ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा खोटारेडापणा आहे,

आपल्या काळात त्यांनी काय केले नाही म्हणून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी असे खोटेनाटे आरोप केले आहेत अशी टीका आता चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्याता आली आहे.

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.