AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे खोटं बोलतात, त्याचं तोंड विना फेव्हिकॉलचं बंद होणार, आदित्य ठाकरेंवर या नेत्यांनी साधला निशाणा

दांता प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे राज्याबाहेर गेला असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे खोटं बोलतात, त्याचं तोंड विना फेव्हिकॉलचं बंद होणार, आदित्य ठाकरेंवर या नेत्यांनी साधला निशाणा
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 30, 2022 | 7:22 PM
Share

मुंबईः वेदांता प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना आव्हान देत आपल्यासोबत वेदांतावरून डिबेट करा असं जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खोटं बोलत आहे असा आरोप भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वेदांता प्रकरणावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.

ठाकरेंवर टीका करताना आमदार आदित्य ठाकरे खोटं बोलतात अशी थेट टीका केली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आदित्य ठाकरे यांनी जर पुरावे दिले नाही तर आदित्य ठाकरे यांचे तोंड विनाफेव्हिकॉलचं बंद होई असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेदांता प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित करावा आणि जर सरकारने जर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.

तर मात्र सरकारचं तोंड बंद होईल आणि उत्तर दिले गेले तर आदित्य ठाकरे यांचे तोंड विना फेव्हिकॉल बंद होईल असंही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका करताना त्यांनी ठाकरे गट आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सरकारवर खोटेनाटे आरोप करत आहे असा आरोप केला आहे.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातच गेले नाहीत. त्यामुळे वेदांताविषयी चर्चा कोणाबरोबर करणार असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

मागच्या सरकारच्या काळात वेदांता प्रकल्पासाठी कुठेही जागा मिळाली नाही, त्यांच्याबाबत कुठेही बैठका झाल्या नाहीत, वेदांता प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे राज्याबाहेर गेला आहे.

त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयात गेले नाहीत, त्यामुळे कोणाबरोबर बैठका घ्यायच्या हा प्रश्न होता. आदित्या ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा खोटारेडापणा आहे,

आपल्या काळात त्यांनी काय केले नाही म्हणून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी असे खोटेनाटे आरोप केले आहेत अशी टीका आता चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्याता आली आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...