AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नैसर्गिक न्यायाला धरून सुनावणी सुरू”; ठाकरे गटानं न्यायपालिकेवर विश्वास व्यक्त केला

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटाच्या वकिलांच्या बाजू ऐकून घेतली आहे. त्यामुळे आता त्यातच हे प्रकरण ज्या वेळी निवडणूक आयोगाकडे गेले होते.

नैसर्गिक न्यायाला धरून सुनावणी सुरू; ठाकरे गटानं न्यायपालिकेवर विश्वास व्यक्त केला
| Updated on: Feb 22, 2023 | 6:27 PM
Share

मुंबईः ठाकरे गटाच्या आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून वेगवेगळी मतं व्यक्त केली जात असली तरी सर्वोच्च न्यायालयात आमची भूमिका एकूण घेतली जात आहे असे मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या पक्षातर्फेदेखील आम्ही आमची बाजू योग्य पद्धतीने मांडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबत मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, सर्वोच्य न्यायालय याबाबत आता सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरु असलेली सुनावणी ही नैसर्गिक न्यायाला धरून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाकडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी करून अशा फक्त अफवा पसरवल्या जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयानंतरच शिंदे गट विचार करेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाने आम्ही त्यांच व्हीप मानत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरुन असे दिसून येत आहे की, ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट असून त्याबाबत सर्व बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे गटाला न्याय देतील असा विश्वास आम्हाला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटाच्या वकिलांच्या बाजू ऐकून घेतली आहे. त्यामुळे आता त्यातच हे प्रकरण ज्या वेळी निवडणूक आयोगाकडे गेले होते.

त्याच वेळी त्यांनांही शिवसेना ही विभक्त झाली आहे हे निवडणूक आयोगानं मान्य केलं असल्याची माहितीही अंबादास दानवे यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून आमची बाजू योग्य पद्धतीने ऐकून घेतली जात असल्याने आणि पक्षातर्फेही कपिल सिब्बल यांच्याकडून बाजू योग्य पद्धतीने न्यायालयात मांडली जात असल्यामुळे आम्ही याबाबत आशावादी आहोत असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.