AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या म्हणतील शिवरायांचा जन्म सुरतला झाला, काय वाह्यातपणा चाललाय?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने फटकारलं

एकदा आम्ही आत्मक्लेश केला. आता आत्मक्लेश करणार नाही. एकदा आम्ही गांधीवादीमार्गाने चाललो, पुढचा मार्ग आमचा भगतसिंगाचा असू शकतो याची खबरदारी भाजपने घ्यावी.

उद्या म्हणतील शिवरायांचा जन्म सुरतला झाला, काय वाह्यातपणा चाललाय?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने फटकारलं
उद्या म्हणतील शिवरायांचा जन्म सुरतला झाला, काय वाह्यातपणा चाललाय?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने फटकारलंImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 04, 2022 | 2:03 PM
Share

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त विधान केलेलं असतानाच आता भाजपचे नेते, आमदार प्रसाद लाड यांनी अजब विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि रायगडावर त्यांचं बालपण गेल्याचा जावई शोध लाड यांनी लावला आहे. लाड यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे. उद्या गुजरातच्या लोकांना खूश करण्यासाठी शिवाजी महाराजांचा जन्म सुरतला झाल्याचंही हे लोक म्हणतील. काय वाह्यातपणा चालला आहे? असा संतप्त सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रसाद लाड यांच्या विधानावरून भाजपची अक्षरश: लक्तरे काढली. उद्या जर गुजरात महोत्सव झाला. तिथे प्रसाद लाड यांना बोलावलं. तर गुजरातच्या लोकांना खूश करण्यासाठी ते असंही म्हणतील शिवाजी महाराजांचा जन्म सुरतला झाला होता. काय वाह्यातपणा लावलाय? तेही शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत, असा संताप अमोल मिटकरी यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात येत आहे. भाजपच्या लोकांकडून वारंवार हा अवमान केला जात आहे. या सर्व गोष्टींना देवेंद्र फडणवीसांचं मूक समर्थन कारणीभूत आहे. कोणीच त्यांना आवर घालताना दिसत नाही, असं मिटकरी म्हणाले.

भाजपने महाराजांचा अपमान करण्याची सुपारी उचलली आहे का? उचलली आहे का नाही त्यांनी उचललीच आहे. कोश्यारी, त्रिवेदी, लोढा आणि प्रसाद लाड यांनी तर नवीनच जावई शोध लावला. लहानपणापासून आपण सर्व इतिहास वाचत आलो. शिवरायांचा जन्म जिजाऊंच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर झाला. हे माहीत असताना कोकण महोत्सवात प्रसाद लाड यांनी नवीन जावई शोध लावला, अशी टीका त्यांनी केली.

शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं त्यांनी सांगितलं. बरं ते वाचून सांगत आहेत. बाजूला प्रवीण दरेकर बसले आहेत. ते काहीच बोलत नाहीत. यापुढे जाऊन ते असंही म्हणतात की शिवाजी महाराजांचं बालपण रायगडावर गेलं. अहो शिवाजी महाराजांचं बालपण राजगडावर गेलं.

स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती. तिथे जिजाऊसाहेब आणि शहाजी राजे यांनी त्यांना आत्मसंरक्षणाचे आणि स्वराज्याचे धडे दिले. हा धगधगता इतिहास आहे. हा गौरवशाली इतिहास असताना भाजपकडून जाणीवपूर्वक चुकीची मांडणी केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

एकदा आम्ही आत्मक्लेश केला. आता आत्मक्लेश करणार नाही. एकदा आम्ही गांधीवादीमार्गाने चाललो, पुढचा मार्ग आमचा भगतसिंगाचा असू शकतो याची खबरदारी भाजपने घ्यावी. आता सारवासारव करू नका. जाणीवपूर्वक तुम्ही बोलला आहात. स्क्रिप्ट समोर ठेवूनच बोलला. त्यामुळे माफी मागून चालणार नाही. नाक घासावं आणि प्रायश्चित करावं, अशी मागणी त्यांनी केली.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.