AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu : शिंदे-फडणवीस सरकारचा पुढच्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार 15 सप्टेंबरपर्यंत? बच्चू कडू म्हणतात…

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र अनेकांचा अपेक्षाभंग झाला. काहींनी जाहीर नाराजीही व्यक्त केली. यात संजय शिरसाट तसेच बच्चू कडू यांचाही समावेश आहे.

Bachchu Kadu : शिंदे-फडणवीस सरकारचा पुढच्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार 15 सप्टेंबरपर्यंत? बच्चू कडू म्हणतात...
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात प्रतिक्रिया देताना बच्चू कडूImage Credit source: tv9
| Updated on: Aug 18, 2022 | 10:24 AM
Share

मुंबई : मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तार नुकताच झाला. मात्र यात बच्चू कडूंचा समावेश नव्हता. आपले नाव मंत्रिमंडळ यादीत नसल्याने त्यावेळी बच्चू कडू यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आपल्याला शब्द देण्यात आला होता, असेही ते म्हणाले होते. आता अधिवेशन (Assembly session) सुरू आहे. त्यानिमित्त मुंबईत आले असता त्यांना याविषयी विचारण्यात आले. त्यावर आपण नाराज नाही. 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Cabinet expansion) होणार आहे. तेव्हा माझा विचार केला जाणार आहे, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. तसेच आपण नाराज नाही, असेदेखील ते म्हणाले.

अनेकांचा अपेक्षाभंग

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तोदेखील मर्यादित स्वरुपात. यावेळी भाजपा आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व मिळून 50 आमदार आल्याने प्रत्येकालाच महत्त्वाकांक्षा, मंत्रीपदाची अपेक्षा होती. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र अनेकांचा अपेक्षाभंग झाला. काहींनी जाहीर नाराजीही व्यक्त केली. यात संजय शिरसाट तसेच बच्चू कडू यांचाही समावेश आहे. मात्र आता आपण नाराज नाही, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

काय म्हणाले बच्चू कडू?

‘आमची लढाई सुरू राहील’

सामाजिक न्याय, अपंग कल्याण मंत्रीपद तसेच अमरावतीचे पालकमंत्रीपद अशा बच्चू कडूंच्या मागण्या आहेत. मात्र पहिल्या विस्तारात त्यांना संधी देण्यात आली नव्हती. आपण नाराज आहोत, असे नाही. व्यक्तीगत हितासाठी आम्ही नाराज होणार नाहीत. आमचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर आमची लढाई सुरू राहील. शिवाय पुढील मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू मंत्रिमंडळात असतील, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.