AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणीपट्टी वसूलीसाठी पालिकेची अभय योजना, 138 कोटी रुपये तिजोरीत जमा

नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC Abhay Yojana for water bill recovery) 

पाणीपट्टी वसूलीसाठी पालिकेची अभय योजना, 138 कोटी रुपये तिजोरीत जमा
| Updated on: Nov 15, 2020 | 9:26 AM
Share

मुंबई : कोरोना संकटामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांचे पाणीपट्टी, वीजेचे बिल थकले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने अभय योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत पाणीपट्टी थकविणाऱ्या नागरिकांकडून 138 कोटींची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे. या योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC Abhay Yojana for water bill recovery)

मुंबईतील नागरिकांनी त्यांच्या जलदेयकांचे बील जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्यात भरणे बंधनकारक आहे. मात्र एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर दर महिन्याला दोन टक्के अतिरिक्त आकारणी केली जाते. या अतिरिक्त आकारामुळे थकबाकीची रक्कम वाढत जाते. या थकबाकीबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी पालिकेने 15 फेब्रुवारी 2020 पासून ‘अभय योजना 2020’ सुरु केली होती.

शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकली आहे. ही थकीत रक्कम वसूल व्हावी आणि नागरिकांनी वेळेवर पाणीपट्टी भरावी यासाठी प्रशासनाने अभय योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत दोन टक्के अतिरिक्त आकारणी शुल्क माफ केले जाते.

या योजनेला मिळत असलेला नागरिकांचा प्रतिसाद पाहून योजनेला 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई पालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे.

30.55 कोटींची सूट

या योजनेअंतर्गत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत 56 हजार 964 जलजोडणीधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत जलजोडणी-धारकांकडून 138.19 कोटी रुपये कर पालिकेकडे जमा करण्यात आला. तर महानगरपालिकेद्वारे तब्बल 30.55 कोटी रुपयांची सूट जलजोडणीधारकांना देण्यात आली. (BMC Abhay Yojana for water bill recovery)

संबंधित बातम्या : 

मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, लोकलमधून प्रवासाची मुभा, रेल्वेचा राज्याच्या निर्णयाला ग्रीन सिग्नल

आता मुंबईकर वाचवणार मुंबईकरांचा जीव, महापालिकेकडून नागरिकांना विशेष प्रशिक्षण

Follow Us
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल