AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC वैधानिक समिती निवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादी-सपाचा पाठिंबा, काँग्रेसचा निर्णय काय?

महत्वाच्या समित्यांवर शिवसेनेकडून यंदा आधीच्याच अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. (BMC Standing Committee Election Shivsena )

BMC वैधानिक समिती निवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादी-सपाचा पाठिंबा, काँग्रेसचा निर्णय काय?
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
| Updated on: Apr 01, 2021 | 4:07 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची नांदी होताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी होणाऱ्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी दिग्गज नगरसेवक यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. (BMC Standing Committee Election Shivsena backed by NCP SP)

भाजपला रोखण्यासाठी जुनी फळीच मैदानात

महत्वाच्या समित्यांवर शिवसेनेकडून यंदा आधीच्याच अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून भाजपला रोखण्यासाठी जुनी फळीच मैदानात उतरवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने अर्ज दाखल केले नाहीत.

काँग्रेसही शिवसेनेलाच पाठिंबा देणार

काँग्रेसकडून समिती निवडणुकांसाठी अर्ज दाखल झाले असले, तरी काँग्रेस अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसही शिवसेनेलाच पाठिंबा देणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. भाजपला रोखण्यासाठी आगामी काळात महापालिकेतही महाविकास आघाडीतल्या पक्षांची एकजूट होताना दिसत आहे.

शिवसेनेकडून वैधानिक समिती निवडणुकीसाठी कोणाकोणाचा अर्ज दाखल?

यशवंत जाधव यांचा स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

संध्या दोषी यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

सदा परब यांचा सुधार समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी आशिष चेंबुरकर यांना संधी

यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी

मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून पुन्हा यशवंत जाधव यांची वर्णी लागली आहे. शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली. आगामी बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी यशवंत जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. (BMC Standing Committee Election Shivsena backed by NCP SP)

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

  • शिवसेना – 92
  • भाजप – 82
  • काँग्रेस – 30
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 9
  • समाजवादी पक्ष– 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1

संबंधित बातम्या :

बीएमसी स्थायीसह सात समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक, सेनेसह भाजप, काँग्रेसही रिंगणात; अनिल परबांना विजयाचा विश्वास

BMC च्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक, शिवसेनेसमोर भाजपसह काँग्रेसचेही आव्हान

(BMC Standing Committee Election Shivsena backed by NCP SP)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.