AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, रात्री उशिरा मुंबईत मोठ्या हालचाली, ‘वर्षा’वर काय घडतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, रात्री उशिरा मुंबईत मोठ्या हालचाली, 'वर्षा'वर काय घडतंय?
| Updated on: Jul 11, 2023 | 11:52 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडत आहे. विशेष म्हणजे काल रात्री उशिरा देखील या तीन नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर आज पुन्हा रात्री उशिरा या तीन नेत्यांमध्ये बैठक सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील कालच्या बैठकीनंतर आज राष्ट्रवादीच्या आठ नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्रालयातील कोणतं दालन कुणाला द्यावं, याबाबत राज्य सरकारकडून माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हं मिळत आहेत. त्यासाठीच या तीनही बड्या नेत्यांची बैठक पार पडत असल्याची मिळत आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत. शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी तर मंत्रिमंडळ विस्तार जाहीर होण्याआधीच मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला सांगून टाकला आहे. भरत गोगावले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना भाजप आणि शिवसेनेत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती गोगावले यांनी दिली. तसेच याच फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी सात नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार जाहीर होण्याआधीच खात्रीलायक सूत्रांनी या विस्तारातील तीन मंत्र्यांची नावे सांगितली आहे. यामध्ये भारत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांचं नाव समोर आलं आहे. तसेच चौथ्या नावासाठी संजय शिरसाट आणि योगेश रायमूलकर यांच्यामध्ये चुरस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता कुणाची मंत्रिपदी वर्णी लागते ते लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याशिवाय या विस्तारात राष्ट्रवादीला स्थान नसणारची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, ही बैठक सुरु असताना शिंदे गटाचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी ‘वर्षा’ बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.  “वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री विस्ताराबद्दल लवकरच निर्णय घेतील. मी आतमध्ये होतो. माझ्या विभागाचे काही काम होतं, त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. सध्या चर्चा सुरू आहे, महाराष्ट्र राज्याच्या विकास होत आहे म्हणून अजित पवार सोबत आलेले आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.