AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachhu Kadu : एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवलं हेच खूप झालं, बच्चू कडू यांचा टोला कुणाला?

Bachhu Kadu Big Statement : विधानसभेतील दारुण पराभवानंतर बच्चू कडू यांनी आज त्यांच्या पदाधिकारी आणि नेत्यांची मुंबईत तातडीने बैठक घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवलं हेच खूप झालं, असा जोमदार टोला लगावला. बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

Bachhu Kadu : एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवलं हेच खूप झालं, बच्चू कडू यांचा टोला कुणाला?
बच्चू कडू, एकनाथ शिंदे, भाजप, शिवसेना
| Updated on: Nov 29, 2024 | 10:47 AM
Share

विधानसभेतील दारूण पराभावानंतर बच्चू कडू यांनी आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत तातडीने बैठक घेतली. मुंबईतील वाय. बी.चव्हाण सेंटर येथे ही बैठक त्यांनी घेतली. संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हाप्रमुख आणि उमेदवार यांच्यासह 60 ते 70 लोकांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवलं हेच खूप झालं, असा चिमटा त्यांनी काढला. यावेळी त्यांनी अनेक विषयावर त्यांचे मत व्यक्त केले.

फडणवीसांना दिल्या शुभेच्छा

बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी चांगला कारभार करावा. शेतकर्‍यांची कर्ज माफीची घोषणा करावी. दिव्यांगांचे मानधनांमध्ये वाढ करावी. मला असे वाटते का एकंदरीत जशी लाडकी बहीण आहे त्याचे लाडके शेतकरी करता येईल का? लाडका मजूर करता येईल का? लाडका दिव्यांग करता येईल का? हा विचार करावा, असे कडू म्हणाले.

भाजपावर साधला निशाणा

भाजपा जेव्हा पूर्णपणे सत्तेत येते तेव्हा काय होते, यावर त्यांनी भाष्य केले. एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हेच मोठे झाले, असा टोला त्यांनी लगावला आणि भाजपावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे हे राज्यातच असतील ते केंद्रात जाणार नाहीत असे मत कडू यांनी व्यक्त केले. भाजपा त्यांना गृहमंत्री पद देणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. भाजपाने त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं झाले. भाजपाने तेवढी तरी जाणीव ठेवली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्रातही मित्र पक्षांची गरज

चांगली गोष्ट आहे मला वाटतं आता या सगळ्या समीकरणात श्रीकांत शिंदे असेल किंवा प्रफुल पटेल असेल केंद्रामध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण होऊ नये कदाचित केंद्रात जर गरज राहिली नसती तर आज राज्याचे चित्र वेगळं राहिलं असतं भाजपला केंद्रात पण गरज आहे ना मित्र पक्षाची मित्रपक्ष नाहीतर केंद्रात मग सत्ता ते पण अडचण येऊ शकतात, असे बच्चू कडू म्हणाले.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.