AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात डोळ्यांची साथ फोफावली, पुण्यात हजारो रुग्ण आढळले, काळजी घ्या

महाराष्ट्रात डोळे येण्याची साथ आता वाढत चालली आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ बुलढाणा, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात ही साथ वाढली आहे.

महाराष्ट्रात डोळ्यांची साथ फोफावली, पुण्यात हजारो रुग्ण आढळले, काळजी घ्या
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 29, 2023 | 6:06 PM
Share

मुंबई | 29 जुलै 2023 : महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस पडतोय. पावसाचा जोर आज कमी झालाय. पण गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. अनेक ठिकाणी पाणी साचलं. नद्यांना पूर आला. जनजीवन विस्कळीत झालं. पावसाचा जोर आता कमी झालाय. पाऊस कदाचित काही दिवसांसाठी आराम घेण्याची शक्यता आहे. असं असलं तरी पाऊस विश्रांतीला जात असताना आता पाठीमागे आजार सोडून जात असल्याचं चित्र आहे. वातावरणातील अनिश्चित बदलांमुले आता साथीचे रोग पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. राज्यभरात सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. विशेषत: पुण्यात ही साथ जास्त वाढली आहे.

लहान मुलांना डोळे येण्याचं प्रमाण अधिक आहे. याावर्षी डोळ्यांचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा दिसत असला तरी संसर्ग मात्र मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्या. गरज असल्यास डॉक्टरांकडे जा, असा सल्ला ज्येष्ठ डॉक्टरांनी दिला आहे.

राज्यात डोळ्यांची साथ, कुठे किती रुग्ण?

पुणे जिल्ह्यात डोळ्यांची साथ जास्त वाढली आहे. पुण्यात 7 हजार 871 रुग्ण आढळले आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यात 6 हजार 693 रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात 2 हजार 611 रुग्ण आढळले आहेत. गोंदिया जिल्ह्यात 2 हजार 591 रुग्णांची नोंद झालीय. तर धुळे जिल्ह्यात 2 हजार 295 रुग्णांची नोंद झालीय. जालना जिल्ह्यात 1 हजार 512 रुग्ण आढळले आहेत.

वाशिम जिल्ह्यात 1 हजार 427 रुग्ण आढळले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात 1 हजार 425 रुग्ण आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यात 1 हजार 323 रुग्ण आढळले आहेत. नाशिक शहरात देखील डोळ्यांच्या आजाराची साथ पसरली आहे. शहरात दोन दिवसात 156 रुग्ण आढळले आहेत.

नेत्रतज्ज्ञांचं महत्त्वाचं आवाहन

आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “डोळे येणे आजार हा औषधांशिवाय बरा होऊ शकतो. रुग्णांना घाबरून जाण्याची गरज नाही. दिवसातून हात पाच वेळा स्वच्छ धुवा. डोळे पाण्यानं स्वच्छ करा. मेडिकलमध्ये जाऊन स्टेरॉईड डोळ्यांमध्ये सोडलं तर धोका संभवू शकतो. मात्र डोळे आलेल्या रुग्णांपासून दूर राहा”, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

डोळे येण्याची लक्षणे कोणती?

  • 1) डोळे लाल होणे आणि पिवळसर द्रव डोळ्यातून येणे
  • 2) डोळ्यातून सतत पाणी येत राहणे
  • 3) डोळे सतत चोळावेसे वाटणे
  • 4) दोन्ही डोळ्यांना एकदम सूज येणे
  • 5) डोळ्यांना सतत खाज येणे
  • 6) पापण्या एकमेकांना चिकटणे

डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?

  • डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुत राहावे
  • नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे.
  • डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करा
  • उन्हात काळ्या रंगाच्या चष्म्यांचा वापर करावा

Follow Us
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं.
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.