AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : मराठवाड्यात पावसाची रझाकारी; सरसकट कर्ज माफी द्या, उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी

Uddhav Thackeray to Fadnavis : पावसाच्या रझाकारीने मराठवाड्यावर मोठे संकट ओढावले आहे. पायाखाली पाणी आणि डोळ्यात पाणी अशी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर बोट ठेवत उद्धव ठाकरे यांनी मोठी मागणी केली आहे.

Uddhav Thackeray : मराठवाड्यात पावसाची रझाकारी; सरसकट कर्ज माफी द्या, उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
उद्धव ठाकरे
| Updated on: Sep 27, 2025 | 1:45 PM
Share

मराठवाड्यात पावसाची रझाकारी दिसून आली. गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार पाच दिवसात तर अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. झाडून सर्व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी डोळ्यांनी हे नुकसान पाहिले. पण मदत करताना निकषाचा डोंगर उभा ठाकला आहे. तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. तर काल मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी सरकारला कानपिचक्या सुद्धा दिल्या.

सरकारची मदत तुटपूंजी

मराठवाड्यात आकाश फाटलं आहे. अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झाले. पीक उद्धवस्त झालं. पीकं सडलेली होती. शेतात पाणी होतं. शेतकरी धायमोकलून रडत होते. शेतकरी आपुलकीने माझ्याशी बोलले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारने आता जी मदत देऊ केली आहे. ती अगदीच तुटपूंजी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. खूप मोठं नुकसान झालं आहे. दोन-तीन वर्ष त्यांना या संकटातून बाहेर पडायला लागेल. विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तकं वाहून गेली आहे. हे मोठं नुकसान आहे. त्यामुळे सरकारने आता निकष न लावता सरसकट मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आम्ही पंचाग काढून नाही बसलो

शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी करणे जर राजकारण असेल तर हो ते राजकारण आहे. शेतकऱ्यांने कर्जमाफी कधी देणार असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर, मुख्यमंत्री त्याला म्हणत आहेत की राजकारण करू नका. त्याच्या मागे पोलीस लावले जात आहे. मग राजकारण कोण करतंय, असे विचारत आम्ही पंचाग काढून नाही बसलो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

सरसकट कर्ज मुक्त करा

आतापर्यंत जाहीर झालेली 14 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. 2017 मध्ये जी कर्जमाफीची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी झाली नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत केला. पंजाब राज्य सरकारने जशी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर केली. तशी मदत महाराष्ट्र सरकारने जाहीर करावी असी मागणी त्यांनी केली. तर हे नुकसान येत्या 2 ते 3 वर्षांत भरून निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त करा अशी मागणी त्यांनी केली.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक