AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : दहीहंडीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक पण मोठं राजकीय स्टेटमेंट

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरळी जांबोरी मैदानातील दहीहंडी उत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी एक सचूक पण मोठं राजकीय स्टेटमेंट केलं. वरळीत गेल्या अनेक वर्षापासून दहीहंडी बांधली जातेय. बरीच गोविंदा पथक इथे येत असातत. आधी सचिन अहिर ही दहीहंडी बांधायचे. आता भाजपकडून इथे दहीहंडी उत्सवाच आयोजन केलं जातं.

Devendra Fadnavis : दहीहंडीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक पण मोठं राजकीय स्टेटमेंट
Devendra Fadnavis
| Updated on: Aug 16, 2025 | 1:43 PM
Share

“छावा साकारलेला आहे. ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांच शौर्य आमच्या गोविंदांनी मनोऱ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो. परिवर्तन दहीहंडी या भागात अनेक वर्षांपासून सुरु आहे. आमच्या गोविंदांकरता आकर्षणाच केंद्र आहे. संतोष पांडे ज्या प्रकारे आयोजन करतात, त्या बद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा देतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी वरळी जांबोरी मैदानातील परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर छावा सिनेमातील एक दृश्य साकारण्यात आलं. आजच्या दिवशी राजकीय नेते विविध दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला भेट देत असतात.

दहीहंडी मंचावरुन खाली उतरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परिवर्तन दहीहंडीचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागेल. त्या विकासाच्या हंडीतल जे काही लोणी आहे, ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे”

इतकी वर्ष लोणी कुठे जात होतं?

“दहीहंडीच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करावा, अशी सर्वांना विनंती आहे” इतकी वर्ष लोणी कुठे जात होतं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुठे जात होतं, तुम्हाला माहित आहे. तुम्ही माझ्या तोंडातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय. पण जनतेला माहित आहे, लोणी कोणी खाल्लं”

‘उत्सवावरची बंधनं हटवली’

“दहीहंडी, गणेश उत्सवावर बंधन होती, सगळी बंधनं शिंदे साहेबांच सरकार असताना हटवण्यात आली. आता आमचं सरकार आहे, सगळी बंधन हटवण्यात आलेली आहेत. प्रचंड उत्साह आहे. उत्साहात दंहीहंडी साजरी होतेय” असं फडणवीस म्हणाले. “रात्रीपासून पाऊस पडतोय, आजही पावसाचा अंदाज आहे. कितीही पाऊस पडला, तरी गोविंदाच्या उत्साहाचा पाऊस त्यापेक्षा मोठा आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.