AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिलं – जयंत पाटील

इंडिया आघाडीची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी सर्वच नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, संघर्षाला आता तर सुरुवात झाली आहे. लढाई अजून बाकी आहे.

इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिलं - जयंत पाटील
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 15, 2024 | 3:00 PM
Share

लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर महाविकासआघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सर्व पक्षांचे आभार मानले. ते म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. सर्वच मित्र पक्षांनी मेहनत घेतली. विविध संघटनांनीही मोठी कामगिरी बजावली. जनजागरण केलं. निर्भय बनो ही संघटना आहे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि निखिल वागळे यांनी चांगलं काम केलं. महाराष्ट्रात जनजागरण केलं. त्यामुळे हा विजय प्राप्त झाला आहे. देशातील राजकारणात महाराष्ट्राने वठवलेली भूमिका महत्त्वाची आहे. इंडिया आघाडीला जे बळ जनतेने दिलं, त्यात सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिलं आहे.’

महाराष्ट्राने लोकशाही वाचवली – चव्हाण

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी  ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. लोकशाही वाचवण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेने केलं. त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आघाडीला निर्णायक बहुमत दिलं आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. यात ३० ते ४०च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते. या सर्वांनी मेहनत घेतली. जनजागरण केलं. पक्ष आणि संघटनांची यादी आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनीही महाराष्ट्रातील वातावरण निर्माण केलं. राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. सिंहाचा वाटा आहे.’

लढाई आता सुरु झालीये – ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, हा विजय अंतिम नाही. ही लढाई आता सुरु झाली आहे. इतर निवडणुकाही आता येतील. मोदी सरकार आता एनडीए सरकार झाले आहे. हे सरकार किती दिवस टिकणार हे माहित नाही. जनतेची जनता या निवडणुकीत जागी झाली.

देशाच्या पंतप्रधानांच्या विधानसभेच्या निवडणुकीत जेवढ्या सभा होतील. तेवढं आम्ही बहुमता जवळ जाऊ त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

Follow Us
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना.
गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! महायुतीमधील अंतर्गत वाद..
गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! महायुतीमधील अंतर्गत वाद...
जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा...
जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा....