AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिलं – जयंत पाटील

इंडिया आघाडीची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी सर्वच नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, संघर्षाला आता तर सुरुवात झाली आहे. लढाई अजून बाकी आहे.

इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिलं - जयंत पाटील
| Updated on: Jun 15, 2024 | 3:00 PM
Share

लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर महाविकासआघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सर्व पक्षांचे आभार मानले. ते म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. सर्वच मित्र पक्षांनी मेहनत घेतली. विविध संघटनांनीही मोठी कामगिरी बजावली. जनजागरण केलं. निर्भय बनो ही संघटना आहे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि निखिल वागळे यांनी चांगलं काम केलं. महाराष्ट्रात जनजागरण केलं. त्यामुळे हा विजय प्राप्त झाला आहे. देशातील राजकारणात महाराष्ट्राने वठवलेली भूमिका महत्त्वाची आहे. इंडिया आघाडीला जे बळ जनतेने दिलं, त्यात सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिलं आहे.’

महाराष्ट्राने लोकशाही वाचवली – चव्हाण

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी  ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. लोकशाही वाचवण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेने केलं. त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आघाडीला निर्णायक बहुमत दिलं आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. यात ३० ते ४०च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते. या सर्वांनी मेहनत घेतली. जनजागरण केलं. पक्ष आणि संघटनांची यादी आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनीही महाराष्ट्रातील वातावरण निर्माण केलं. राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. सिंहाचा वाटा आहे.’

लढाई आता सुरु झालीये – ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, हा विजय अंतिम नाही. ही लढाई आता सुरु झाली आहे. इतर निवडणुकाही आता येतील. मोदी सरकार आता एनडीए सरकार झाले आहे. हे सरकार किती दिवस टिकणार हे माहित नाही. जनतेची जनता या निवडणुकीत जागी झाली.

देशाच्या पंतप्रधानांच्या विधानसभेच्या निवडणुकीत जेवढ्या सभा होतील. तेवढं आम्ही बहुमता जवळ जाऊ त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.