AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 वी ते 10 वीचे 29,819 विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत गैरहजर, शाळेत येण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांचे समुपदेशन

तरी राज्यातील बरेचसे पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत अद्यापही संभ्रमात आहेत. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील 8 वी, 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरु करण्यात आले. मात्र, त्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक होतं. शिक्षणविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिलीये.

8 वी ते 10 वीचे 29,819 विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत गैरहजर, शाळेत येण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांचे समुपदेशन
school student
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र सरकारने येत्या 1 डिसेंबरपासून शाळेची घंटा (School Reopen) वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाच काय होणार असे प्रश्न उपस्थित झाला आहे आहेत. त्यावर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही निर्णय घेण्यात आलेला नाही. निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, अशी स्पष्ट माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तरीही, शाळांना दिलेल्या आदेशानुसार, शाळांनी तयारी सुरु केली आहे.

मात्र, असं असलं तरी राज्यातील बरेचसे पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत अद्यापही संभ्रमात आहेत. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील 8 वी, 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरु करण्यात आले. मात्र, त्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक होतं. शिक्षणविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिलीये. तसेच, या पालकांचे समुपदेशनही करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शिक्षणविभाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 8 वी, 9 वी आणि 10 वीचे एकूण 71 हजार 923 विद्यार्थी आहेत. मात्र, त्यापैकी 47 हजार 634 विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. तर, उर्वरित 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही.

शिक्षणविभागाने जारी केलेली आकडेवारी –

8 To 10 th standdars students data

8 To 10 th standdars students data

शाळेत प्रत्यक्ष येत नसलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभाग त्यांचं समुपदेशन करण्याचं काम करत आहे. त्यासाठी पालकांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन तसेच जनजागृती करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समितीची मदत घेतली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेतली जात आहे. सेवा भावी संस्थांचे सहकार्य घेतले जात आहेत. तसेच, त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गृह भेटी दिल्या जात आहेत.

शाळेत प्रत्यक्षात येऊ न शकणाऱ्यांच्या समस्या काय ?

विद्यार्थी आजारी असणे

स्थलांतरित असणे

रेल्वे प्रवासाची सोय नसणे

बस अथवा रीक्षा-टॅक्सी प्रवासासाठी पैसे नसणे

अर्थार्जनासठी पालकांद्वारे मुलांचा वापर करणे

गृह भेटी दरम्यान तसेच संपर्काचे साधन नसल्याने ठावठिकाणा लागत नाही.

संबंधित बातम्या :

शाळांबाबत तळ्यात-मळ्यात, निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, टोपेंची माहिती

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.