AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 वी ते 10 वीचे 29,819 विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत गैरहजर, शाळेत येण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांचे समुपदेशन

तरी राज्यातील बरेचसे पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत अद्यापही संभ्रमात आहेत. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील 8 वी, 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरु करण्यात आले. मात्र, त्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक होतं. शिक्षणविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिलीये.

8 वी ते 10 वीचे 29,819 विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत गैरहजर, शाळेत येण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांचे समुपदेशन
school student
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Nov 30, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र सरकारने येत्या 1 डिसेंबरपासून शाळेची घंटा (School Reopen) वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाच काय होणार असे प्रश्न उपस्थित झाला आहे आहेत. त्यावर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही निर्णय घेण्यात आलेला नाही. निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, अशी स्पष्ट माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तरीही, शाळांना दिलेल्या आदेशानुसार, शाळांनी तयारी सुरु केली आहे.

मात्र, असं असलं तरी राज्यातील बरेचसे पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत अद्यापही संभ्रमात आहेत. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील 8 वी, 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरु करण्यात आले. मात्र, त्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक होतं. शिक्षणविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिलीये. तसेच, या पालकांचे समुपदेशनही करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शिक्षणविभाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 8 वी, 9 वी आणि 10 वीचे एकूण 71 हजार 923 विद्यार्थी आहेत. मात्र, त्यापैकी 47 हजार 634 विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. तर, उर्वरित 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही.

शिक्षणविभागाने जारी केलेली आकडेवारी –

8 To 10 th standdars students data

8 To 10 th standdars students data

शाळेत प्रत्यक्ष येत नसलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभाग त्यांचं समुपदेशन करण्याचं काम करत आहे. त्यासाठी पालकांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन तसेच जनजागृती करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समितीची मदत घेतली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेतली जात आहे. सेवा भावी संस्थांचे सहकार्य घेतले जात आहेत. तसेच, त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गृह भेटी दिल्या जात आहेत.

शाळेत प्रत्यक्षात येऊ न शकणाऱ्यांच्या समस्या काय ?

विद्यार्थी आजारी असणे

स्थलांतरित असणे

रेल्वे प्रवासाची सोय नसणे

बस अथवा रीक्षा-टॅक्सी प्रवासासाठी पैसे नसणे

अर्थार्जनासठी पालकांद्वारे मुलांचा वापर करणे

गृह भेटी दरम्यान तसेच संपर्काचे साधन नसल्याने ठावठिकाणा लागत नाही.

संबंधित बातम्या :

शाळांबाबत तळ्यात-मळ्यात, निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, टोपेंची माहिती

Follow Us
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.