AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 वी ते 10 वीचे 29,819 विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत गैरहजर, शाळेत येण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांचे समुपदेशन

तरी राज्यातील बरेचसे पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत अद्यापही संभ्रमात आहेत. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील 8 वी, 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरु करण्यात आले. मात्र, त्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक होतं. शिक्षणविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिलीये.

8 वी ते 10 वीचे 29,819 विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत गैरहजर, शाळेत येण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांचे समुपदेशन
school student
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 8:00 AM

मुंबई : महाराष्ट्र सरकारने येत्या 1 डिसेंबरपासून शाळेची घंटा (School Reopen) वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाच काय होणार असे प्रश्न उपस्थित झाला आहे आहेत. त्यावर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही निर्णय घेण्यात आलेला नाही. निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, अशी स्पष्ट माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तरीही, शाळांना दिलेल्या आदेशानुसार, शाळांनी तयारी सुरु केली आहे.

मात्र, असं असलं तरी राज्यातील बरेचसे पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत अद्यापही संभ्रमात आहेत. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील 8 वी, 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरु करण्यात आले. मात्र, त्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक होतं. शिक्षणविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिलीये. तसेच, या पालकांचे समुपदेशनही करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शिक्षणविभाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 8 वी, 9 वी आणि 10 वीचे एकूण 71 हजार 923 विद्यार्थी आहेत. मात्र, त्यापैकी 47 हजार 634 विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. तर, उर्वरित 29,819 विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत येण्यासाठी संमती दर्शवलेली नाही.

शिक्षणविभागाने जारी केलेली आकडेवारी –

8 To 10 th standdars students data

8 To 10 th standdars students data

शाळेत प्रत्यक्ष येत नसलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभाग त्यांचं समुपदेशन करण्याचं काम करत आहे. त्यासाठी पालकांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन तसेच जनजागृती करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समितीची मदत घेतली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेतली जात आहे. सेवा भावी संस्थांचे सहकार्य घेतले जात आहेत. तसेच, त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गृह भेटी दिल्या जात आहेत.

शाळेत प्रत्यक्षात येऊ न शकणाऱ्यांच्या समस्या काय ?

विद्यार्थी आजारी असणे

स्थलांतरित असणे

रेल्वे प्रवासाची सोय नसणे

बस अथवा रीक्षा-टॅक्सी प्रवासासाठी पैसे नसणे

अर्थार्जनासठी पालकांद्वारे मुलांचा वापर करणे

गृह भेटी दरम्यान तसेच संपर्काचे साधन नसल्याने ठावठिकाणा लागत नाही.

संबंधित बातम्या :

शाळांबाबत तळ्यात-मळ्यात, निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, टोपेंची माहिती

पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.