AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता, पुढील मान्सूनची वाटचाल कशी असणार? पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

अखेर आता मान्सूनची प्रतिक्षा संपली आहे, मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनची वाटचाल कशी असेल? याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे.

Monsoon Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता, पुढील मान्सूनची वाटचाल कशी असणार? पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
Punjabrao Dakhe Weather UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 9:33 PM
Share

शेतकऱ्यांचे डोळे मान्सूनकडे लागले होते. अखेर प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 25 जिल्हांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं अवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानंतर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यात मान्सूनची पुढील वाटचाल कशी असेल याबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे.

काय आहे पंजाबराव डख यांचा अंदाज? 

‘मान्सून तळकोकणातून सक्रिय झाला आहे. तो आता हळहुळ पुढे सरकत आहे. सात तारखेचा पाऊस हा सर्वदूर होणार नाही. 8 जून, 9 जून असा थोडा-थोडा करत मान्सून राज्यात पुढे सरकणार आहे. 14 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्राचा बरासचा भाग कव्हर करेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे.  सात जूनच्या रात्रीपर्यंत बऱ्याच भागांमध्ये  सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, बीड जिल्हा, लातूर, जिल्हा धाराशिव जिल्हा मराठवाड्यापर्यंत मान्सून मजल मारेल. उत्तर महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांपर्यंत मान्सून पोहोचेल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना देखील सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, जर शेतात एक इतिपेक्षा जास्त ओल असेल तरच पेरणी करावी, एक किंवा दोन बोट ओल असेल तर पेरणी करू नये, असंही यावेळी डख यांनी म्हटलं आहे.

काय आहे भारतीय हवामान विभागाचा अंदाज 

दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून देखील मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे, परंतु तो अद्याप महाराष्ट्राच्या अनेक भागांपर्यंत पोहोचायचा आहे. येत्या 15 जून पर्यंत मान्सून राज्यातील बहुतांश भाग व्यापून टाकेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं