AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात बुडत होता 5 वर्षांचा मुलगा, जर्मन पर्यटकाने कसे वाचवले चिमुकल्याचे प्राण?

Mumbai Boat Accident: बोटीत उपस्थित जर्मन पर्यटकाने वाचवले पाच वर्षांच्या मुलाचे प्राण, पण अपघातानंतर परदेशी पर्यटकाचा मित्र अद्याप बेपत्ता, पर्यटक म्हणाला..., घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे...

समुद्रात बुडत होता 5 वर्षांचा मुलगा, जर्मन पर्यटकाने कसे वाचवले चिमुकल्याचे प्राण?
| Updated on: Dec 19, 2024 | 11:21 AM
Share

Mumbai Boat Accident: जेव्हा मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या ‘नीलकमल’ प्रवाशी बोटीला भारतीय नौदल (Indian Navy) च्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली तेव्हा होत्याचं नव्हतं झालं. पण कठीण प्रसंगी एका जर्मन पर्यटकाने 5 वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहेत. सध्या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात झाला तेव्हा प्रियांश व त्याचे आई-वडील आणि पुणे जिल्ह्यातील चाकण येथून फिरण्यासाठी आले होते. बोट एलिफंटाच्या दिशेने जात असताना अचानक एक स्पीड बेड आली आणि तिने प्रवाशी बोटीला धडक दिली. या दुर्दैवी अपघातात अनेकांनी प्राण गमावले आहेत. तर अनेक जण अद्यापही बेपत्ता आहे. सध्या समुद्रात शोध मोहिम सुरु आहे.

बोटीत परदेशी पर्यटक देखील होते…

बोटीत उपस्थित असलेल्या पर्यटकाने पाच वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले. माध्यामांनी जर्मन नागरिकाने सांगितलं, त्याचा एक विदेशी मित्र अद्याप बेपत्ता आहे. रिपोर्टनुसार, बोटीत 3 परदेशी नागरिक होता. पण याबद्दल अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. बोटीतील प्रवाशांचे नातेवाईक रुग्णालयात चौकशीसाठी जमा झाले आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

कसा झाला अपघात?

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणारी बोट दुसऱ्या बोटीला धडकल्याने भीषण अपघात झाला. बोटीला धडकल्याने दुसरी बोट समुद्राच्या मध्यभागी उलटली. उरण, कारंजा येथे स्पीड बोटीला धडकून हा अपघात झाला. ‘नीलकमल’ नावाच्या बोटीत 120 पेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामधील 13 जणांचा मृत्यू झाला असून रेस्क्यू टीमने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत. तर शोध मोहिम अद्यापही सुरु आहे.

नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ही बोट इंजिन चाचणीसाठी जात होती, मात्र त्यानंतर दुपारी 4 वाजता तिचं नियंत्रण सुटलं आणि कारंजाजवळ नीलकमल नावाच्या बोटीला धडकली. ‘नौदलाने तत्काळ तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या समन्वयाने शोध आणि बचाव कार्य सुरू केलं. बचाव कार्यात नौदलाची चार हेलिकॉप्टर, 11 बोटी, तटरक्षक दलाची एक बोट आणि सागरी पोलिसांच्या तीन बोटींची मदत घेण्यात आली.’ असं देखील नौदलाने सांगितलं आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.