AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्ही कफन चोर, आता तुमचे घोटाळे…’, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

"तुम्ही गुंतवणूकबाबत अडीच तीन वर्ष रडत होते. माझा सवाल आहे, 25 वर्ष महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली, तुम्ही नेमकं काय दिलं? ते सांगा. या पंचवीस वर्षांमध्ये तुम्ही मुंबईला काय दिलं?", असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

'तुम्ही कफन चोर, आता तुमचे घोटाळे...', देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 01, 2024 | 10:21 PM
Share

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतो. महाराष्ट्रमध्ये विकास होईल अशी प्रार्थना करतो. काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला आहे. काँग्रेस हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्यावर येईल, माझ्या शिवसेना नावाचं दुकान हे मी बंद करून टाकेन. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटत असेल? प्रॉपर्टीचे मालक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील. पण विचारांचे मालक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगतात. काय सांगतात? महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला चालले? खरं म्हणजे महाराष्ट्राची ताकदच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांना माहिती नाही. या महाराष्ट्राची क्षमता काय आहे हे त्यांना माहित आहे का? मी त्यांना सांगतो, उद्धवजी ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं तेव्हा मोदीजींचा आशीर्वाद होता. आम्ही 2015 पासून 2019 पर्यंत सातत्याने परकीय थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम केलं. देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गुंतवणूकमध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर होता”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘तुम्ही कफन चोर, आता तुमचे घोटाळे…’

“तुम्ही गुंतवणूकबाबत अडीच तीन वर्ष रडत होते. माझा सवाल आहे, 25 वर्ष महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली, तुम्ही नेमकं काय दिलं? ते सांगा. या पंचवीस वर्षांमध्ये तुम्ही मुंबईला काय दिलं? मोदींचं राज्य आलं. मोदींनी स्टार्टअप पॉलिसी आणली. महाराष्ट्रामध्ये आम्ही स्टार्टअप पॉलिसी आणली. मला असं वाटतं. तुम्ही ज्याच्या सोबत राहता त्यांची सवय तुम्हाला लागली. आता हे अध्यक्ष आहेत का गल्लीचे नेते आहेत?”, असा टोला फडणवीसांनी लगावला. “कोणाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. जोवर चंद्र आहे तोवर मुंबई महाराष्ट्राचीच असणार. तुम्ही कफन चोर आहेत. आता तुमचे घोटाळे बाहेर काढलेत, आगे देखो होता है क्या”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?