AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा एकनाथ शिंदे दरेगावात जातात, आजही…; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान

Sanjay Shirsat on Eknath Shinde : मुख्यमंत्रिपद अन् गृहमंत्रिपदाबाबत सुरु असलेला खल अद्यात संपलेला नाही. आधी मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिंदे गटाने आता गृहमंत्रिपदावर दावा केला आहे. तसंच एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगावात आहेत. तिथं जाण्याचं कारण काय? याबाबतचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. वाचा सविस्तर...

मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा एकनाथ शिंदे दरेगावात जातात, आजही...; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदे, नेते, शिवसेनाImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 30, 2024 | 9:14 AM
Share

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस उलटले आहेत. तरी अद्यापपर्यंत महायुती सरकारचा शपथविधी झालेला नाही. असं असतानाच विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे काम करत आहेत. असं असताना आणि मुख्यमंत्रीपद आणि खातेवाटपाबात महायुतीच्या बैठका नियोजित असताना एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी गेले आहेत. तर त्यांचं अस अचानक साताऱ्याला जाणं भुवया उंचावणारं आहे. अशातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा एकनाथ शिंदे दरेगावात जातात, आजही ते मोठा निर्णय घेणार आहेत, असं शिरसाट म्हणाले.

एकनाथ शिंदे दिल्लीत की राज्यात?

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात राज्यात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची भाजपने ऑफर केली आहे, अशी माहिती आहे. त्यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे राज्यातच राहणार, दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. उपमुख्यमंत्रीपदाबाबत आज शिंदे निर्णय घेणार आहेत. गृहखाते सर्वात महत्त्वाचं आहे. राज्यात गृहखाते आम्ही सक्षमपणे सांभाळू शकतो, असं शिरसाट म्हणाले आहेत.

गोगावलेंना मंत्रिपदाची अपेक्षा

एकनाथ शिंदे दरेगावला का गेलेत? यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी भाष्य केलं आहे. निवडणुकीच्या धावपळीत एकनाथ शिंदेसाहेबांनी आराम केला नाही. म्हणून ते गावाला आरामासाठी गेले आहेत. साहेब आराम करायला गेले आहेत, असं भरत गोगावले म्हणालेत. शिवसेना नेते भरत गोगावले यांनीदेखील महायुतीच्या खातेवाटपावर भाष्य केलं आहे. यावेळेस मला मंत्रिपद भेटेल सर्व गणित जुळून आणली आहेत. कोटावर येऊ नको मुद्द्यावर बोल, असं गोगावले म्हणालेत.

नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शिंदे साहेब सर्व निर्णय घेतील. काही लोकांना संधी मिळेल. त्यामध्ये मलाही संधी असेल.उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना ज्या पद्धतीने गृहमंत्रिपद होतं. त्याच पद्धतीने गृहमंत्रिपद आम्हाला मिळावं, अशी आमची इच्छा आहे, अशी इच्छाही गोगावले यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख....
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख.....