AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशमुखांच्या विधानावरून नव्हे तर एनआयएच्या आरोपपत्राच्या आधारावर आरोप; मलिकांचा चांदीवाल आयोगासमोर खुलासा

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) याने केलेल्या तक्रारीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले.

देशमुखांच्या विधानावरून नव्हे तर एनआयएच्या आरोपपत्राच्या आधारावर आरोप; मलिकांचा चांदीवाल आयोगासमोर खुलासा
देशमुखांच्या विधानावरून नव्हे तर एनआयएच्या आरोपपत्राच्या आधारावर आरोप; मलिकांचा चांदीवाल आयोगासमोर खुलासा
| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 1:44 PM
Share

मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) याने केलेल्या तक्रारीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या विधानावरून आपण कोणतेही आरोप केले नाहीत. तर एनआयएने जे आरोपपत्रं दाखल केलं आहे, त्याच्या आधारेच आपण आरोप केले आहेत, असं नवाब मलिक यांनी चांदीवाल आयोगासमोर स्पष्ट केलं. मीडियाशी संवाद साधताना मलिक यांनी ही माहिती दिली. देशमुखांच्या सांगण्यावरुन मी मीडियाला ब्रिफींग करतो असा अर्ज वाझेंनी दिला होता. मलिकांवर कारवाई झाली पाहिजे. कारण मलिक देशमुखांच्या सांगण्यावरुन बोलत आहे, अशी आम्हाला नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे मी माझा जबाब नोंदवला. आम्ही जे बोललो ते सुनावणीच्या आधारावर आहे. कमिशनवर आम्ही बोलणार नाही. पण एनआयएमध्ये लूपहोल्स आहेत. त्यावर बोलणं आमचा अधिकार आहे, असं म्हणणं आयोगासमोर मांडलं. आमचं म्हणणं ग्राह्य धरत कोर्टाने वाझेंचा अर्ज फेटाळला, अशी माहिती मलिक यांनी दिली.

राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यात आले. आता न्यायालयीन लढाई लढली जात आहे. जे सत्य आहे ते समोर येईल. सत्य नेहमी जिंकते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अनिल देशमुख प्रकरणात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरण हे का घडवण्यात आले. त्याची कारणे काय? परमबीर सिंग यांचा त्यामध्ये रोल काय आहे? एनआयए काय सत्य लपवत आहे? आणि परमबीर सिंग यांना केंद्रसरकार का वाचवत आहे हे सत्य न्यायालयीन लढाईतून समोर येईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

सरकारला बदनाम केलं जात आहे

केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा वापर होतो. कसं बदनाम केलं जातं आणि अडचणीत आणायचं व सरकारला बदनाम करायचं हे यावरून स्पष्ट दिसत आहे. राज्यातील आयटी घोटाळ्यातील सूत्रधार अमोल काळे व इतर भारत सोडून पळून गेले आहेत. काही दुबईत तर काही लंडनला आहेत, असेही ते म्हणाले. या लोकांची गृहखात्याकडून चौकशी सुरू होईल त्यावेळी त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्रसरकारच्या माध्यमातून राज्यसरकार प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

मी परदेशात पळून गेलो नाही, अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार; अमोल काळेंचा इशारा

VIDEO: संजय राऊतांना ईडीनेही बोलावलं होतं म्हणून त्यांना धास्ती वाटतेय; किरीट सोमय्यांचा दावा

Maharashtra News Live Update : महाराष्ट्र शासनाचं कुठलंही कंत्राट घेतलेलं नाही : अमोल काळे

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली