AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशमुखांच्या विधानावरून नव्हे तर एनआयएच्या आरोपपत्राच्या आधारावर आरोप; मलिकांचा चांदीवाल आयोगासमोर खुलासा

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) याने केलेल्या तक्रारीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले.

देशमुखांच्या विधानावरून नव्हे तर एनआयएच्या आरोपपत्राच्या आधारावर आरोप; मलिकांचा चांदीवाल आयोगासमोर खुलासा
देशमुखांच्या विधानावरून नव्हे तर एनआयएच्या आरोपपत्राच्या आधारावर आरोप; मलिकांचा चांदीवाल आयोगासमोर खुलासा
| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 1:44 PM
Share

मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) याने केलेल्या तक्रारीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या विधानावरून आपण कोणतेही आरोप केले नाहीत. तर एनआयएने जे आरोपपत्रं दाखल केलं आहे, त्याच्या आधारेच आपण आरोप केले आहेत, असं नवाब मलिक यांनी चांदीवाल आयोगासमोर स्पष्ट केलं. मीडियाशी संवाद साधताना मलिक यांनी ही माहिती दिली. देशमुखांच्या सांगण्यावरुन मी मीडियाला ब्रिफींग करतो असा अर्ज वाझेंनी दिला होता. मलिकांवर कारवाई झाली पाहिजे. कारण मलिक देशमुखांच्या सांगण्यावरुन बोलत आहे, अशी आम्हाला नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे मी माझा जबाब नोंदवला. आम्ही जे बोललो ते सुनावणीच्या आधारावर आहे. कमिशनवर आम्ही बोलणार नाही. पण एनआयएमध्ये लूपहोल्स आहेत. त्यावर बोलणं आमचा अधिकार आहे, असं म्हणणं आयोगासमोर मांडलं. आमचं म्हणणं ग्राह्य धरत कोर्टाने वाझेंचा अर्ज फेटाळला, अशी माहिती मलिक यांनी दिली.

राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यात आले. आता न्यायालयीन लढाई लढली जात आहे. जे सत्य आहे ते समोर येईल. सत्य नेहमी जिंकते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अनिल देशमुख प्रकरणात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरण हे का घडवण्यात आले. त्याची कारणे काय? परमबीर सिंग यांचा त्यामध्ये रोल काय आहे? एनआयए काय सत्य लपवत आहे? आणि परमबीर सिंग यांना केंद्रसरकार का वाचवत आहे हे सत्य न्यायालयीन लढाईतून समोर येईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

सरकारला बदनाम केलं जात आहे

केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा वापर होतो. कसं बदनाम केलं जातं आणि अडचणीत आणायचं व सरकारला बदनाम करायचं हे यावरून स्पष्ट दिसत आहे. राज्यातील आयटी घोटाळ्यातील सूत्रधार अमोल काळे व इतर भारत सोडून पळून गेले आहेत. काही दुबईत तर काही लंडनला आहेत, असेही ते म्हणाले. या लोकांची गृहखात्याकडून चौकशी सुरू होईल त्यावेळी त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्रसरकारच्या माध्यमातून राज्यसरकार प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

मी परदेशात पळून गेलो नाही, अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार; अमोल काळेंचा इशारा

VIDEO: संजय राऊतांना ईडीनेही बोलावलं होतं म्हणून त्यांना धास्ती वाटतेय; किरीट सोमय्यांचा दावा

Maharashtra News Live Update : महाराष्ट्र शासनाचं कुठलंही कंत्राट घेतलेलं नाही : अमोल काळे

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.