AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानावर पावसाचं सावट, राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाची हजेरी

उद्या 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे (Maharashtra Assembly Elections). मात्र, या मतदानावर पावसाचं सावट असल्याची शक्यता आहे.

मतदानावर पावसाचं सावट, राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाची हजेरी
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Oct 20, 2019 | 11:56 PM
Share

मुंबई : राज्यभरात ठिकठिकाणी परतीच्या पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांममध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. दुसरीकडे, पुणे, पालघर, नाशिक,मनमाड, कराडमध्येही पाऊस सुरु आहे. परतीच्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. शनिवारी (19 ऑक्टोबर) रात्रभर पुण्यात पाऊस सुरु होता, तर रविवारी (20 ऑक्टोबर) सकाळी मुसळधार पावसाला सुरवात झाली. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते हलक्या स्वरुपाचा सरी बसरण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. उद्या 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे (Maharashtra Assembly Elections). मात्र, या मतदानावर पावसाचं सावट असल्याची शक्यता आहे.

सर्व मतदान यंत्रे पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित : नवल किशोर राम 

रविवारी सकाळपासून पुण्यात पाऊस सुरु आहे (Pune Rain). मात्र, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही तयार असून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ‘आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान’, असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मतदारांना केलं. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यासाठीची आवश्यक खबरदारी घेतली आहे. सर्व मतदान यंत्रे पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित आहेत. कोणत्याही मतदान केंद्रात पाण्याची गळती नसल्याचेही नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन दिवसांपासुन जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील 48 तास देखील पावसाचा अंदाज असला तरी मतदारांनी मतदान अवश्य करावे. पुणे जिल्ह्यातील मतदार सुजाण असून ते हवामानाची चिंता न करता आपला मतदानाचा हक्क बजावतील, असा विश्वासही जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यालाही परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. कराडमध्ये काल दुपारपासून पाऊस सुरु आहे. परतीच्या पावसाने नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतीसह बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.

पावसामुळे मका आणि बाजरी भिजून खाराब

मनमाडसह नांदगाव तालुक्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. कालपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर बरसला. अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका आणि बाजरी पावसात भिजून खराब झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांद्याचे पीक आणि द्राक्ष बागांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. आजही तालुक्यात ढगाळ वातावरण असून पावसाची दाट शक्यता आहे. सोमवारी जर असाच पाऊस असला, तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

नांदेडमध्ये पहाटे चार वाजल्यापासून पावसांची संततधार सुरू आहे. विजांच्या गडगडाटासह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस बरसतो आहे. सध्या सोयाबिन काढणीचे काम सुरु आहे, त्यामुळे या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. दुसरीकडे, परतीच्या पावसामुळे ऑक्टोबर महिन्यातील उष्णता कमी झाली आहे.

पालघरमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान 

पालघर जिल्ह्यालाही पावसाने झोडपलं. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कालपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पालघरमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी तांदळचं उत्पादन घेतात. मात्र, भात कापणी सुरु असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं नुकसान झालं. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी दिवाळी अगोदर भात पीक काढून भाताची पावली विकून येणाऱ्या पैश्यांमधून दिवाळी सण साजरा करतात. मात्र यावर्षी दिवाळी आठवड्यावर आली आहे, तरी भात पीक शेतात आहेत. त्यामुळे हातात पैसे नसल्याने शेतकाऱ्यांची ही दिवाळी कोरडीच जाणार असल्याच चित्र आहे.

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर.

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी