AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS BJP : विधानसभा काबीज करण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा प्रचारासाठी खास मंत्र, भाजपच्या वरिष्ठांना समजावून सांगितले हे तंत्र

BJP Election Campaign : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत अलिप्त राहिलेली मातृसंघटना आता विधानसभेपूर्वी सक्रिय झाली आहे. भाजपला प्रचाराचे तंत्र आणि मंत्र संघाने दिला आहे.

RSS BJP : विधानसभा काबीज करण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा प्रचारासाठी खास मंत्र, भाजपच्या वरिष्ठांना समजावून सांगितले हे तंत्र
भाजपला संघाचे बळ
| Updated on: Aug 28, 2024 | 6:37 PM
Share

विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. सर्वच राजकीय पक्ष त्यासाठी कामाला लागले आहेत. यात्रा, सभा आणि आंदोलनाचा धडाका सुरु आहे. थेट जनतेत जाऊन ब्रँडिंग करण्याची एक संधी सुद्धा राजकीय पक्ष सोडताना दिसत नाही. यावेळी भाजपला संघाचे बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत संघाने तटस्थ भूमिका घेतली होती. झारखंड येथील पक्ष मेळाव्यात जे.पी. नड्डा यांनी केलेल्या विधानाची ही प्रतिक्रिया होती. पण विधानसभेसाठी भाजप-संघात दिलजमाई झाली आहे. विधानसभा काबीज करण्यासाठी संघाने भाजपला तंत्र आणि मंत्र दिला आहे.

लोकसभेनंतर भाजपने दूर केली नाराजी

लोकसभा निवडणूक एक हाती जिंकण्याचा भाजपचा विश्वास होता. पण काही राज्यात त्यांना जबरदस्त फटका बसला. त्यानंतर भाजपने संघाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आले. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री राजनाथ सिंह, अमित शाह आणि संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सहकार्यवाह अरुण कुमार, संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्यात दिल्लीत एक बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली.

तरुण चेहऱ्यांना द्या स्थान

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सध्याच्या नेतृत्वासोबतच नवीन चेहऱ्यांना पण निवडणूक प्रचारात उतरवण्याची आग्रही मागणी संघाने भाजपकडे केली आहे. नवीन चेहरामुळे वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती दिली आहे. पण आता भाजपने या प्रक्रियेत हस्तक्षेप करत स्थानिक नेतृत्वासह नवीन चेहऱ्यांना पण संधी देण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संघाची भूमिका महत्वाची

निवडणूक प्रक्रियेत भाजप आणि संघात बैठका होतात. पण या लोकसभेवेळी भाजप-संघात अशी बैठक झाल्याचे दिसून आले नाही. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने विधानसभेसाठी भाजप-संघात समन्वयाची सुरुवात झाली. त्यानुसार गेल्या आठवड्यात दिल्लीत भाजप-संघात बैठकांचे सत्र सुरु झाले. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत संघ संघटनात्मक दृष्ट्या पण सक्रिय भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

Follow Us
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!