AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दारीचा स्टँप शिंदे गट पुसू शकत नाही, ठाकरे गटाच्या नेत्याने बंडखोर आमदारांची कुंडलीच मांडली

अपक्ष आमदारांची गरज नव्हती, तरीही उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळता यावा म्हणून त्यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्री केले.

गद्दारीचा स्टँप शिंदे गट पुसू शकत नाही, ठाकरे गटाच्या नेत्याने बंडखोर आमदारांची कुंडलीच मांडली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 27, 2022 | 7:39 PM
Share

कोल्हापूरः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आज जी शिंदे गटावर टीका केली जात आहे. ती फक्त टीका नाही तर ती जनसामान्यांची भावना आहे. ती फक्त उद्धव ठाकरे सांगतात असं मत ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंडखोरी करून चाळीस आमदार आपल्या गटात सामील करुन घेतले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील नेत्यांनी आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

तर आता मात्र दुसऱ्यांदा गुवाहाटी दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करण्यात आली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी शिंदे गटाची पातळी घसल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यावर बोलताना सचिन आहिर म्हणाले की, बोलण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असले तरी, आपण कोणत्या पदावरून बोलता, आणि काय बोलतो हे महत्वाचे आहे. आपण टीका करताना त्या पदाची गरिमा तर घालवत नाही ना असा सवालही त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

सचिन आहिर यांनी बोलताना महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पाठबळावर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.

त्यावेळी अपक्ष आमदारांची गरज नव्हती, तरीही उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळता यावा म्हणून त्यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्री केले.

राजेंद्र यड्रावरकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नव्हते पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी मंत्रिपद दिली. त्यामुळे आता जरी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात असली तरी शिंदे गटावर जो गद्दारीचा शिक्का बसला आहे तो निघून जाणार नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन