AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दारीचा स्टँप शिंदे गट पुसू शकत नाही, ठाकरे गटाच्या नेत्याने बंडखोर आमदारांची कुंडलीच मांडली

अपक्ष आमदारांची गरज नव्हती, तरीही उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळता यावा म्हणून त्यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्री केले.

गद्दारीचा स्टँप शिंदे गट पुसू शकत नाही, ठाकरे गटाच्या नेत्याने बंडखोर आमदारांची कुंडलीच मांडली
| Updated on: Nov 27, 2022 | 7:39 PM
Share

कोल्हापूरः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आज जी शिंदे गटावर टीका केली जात आहे. ती फक्त टीका नाही तर ती जनसामान्यांची भावना आहे. ती फक्त उद्धव ठाकरे सांगतात असं मत ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंडखोरी करून चाळीस आमदार आपल्या गटात सामील करुन घेतले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील नेत्यांनी आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

तर आता मात्र दुसऱ्यांदा गुवाहाटी दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करण्यात आली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी शिंदे गटाची पातळी घसल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यावर बोलताना सचिन आहिर म्हणाले की, बोलण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असले तरी, आपण कोणत्या पदावरून बोलता, आणि काय बोलतो हे महत्वाचे आहे. आपण टीका करताना त्या पदाची गरिमा तर घालवत नाही ना असा सवालही त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

सचिन आहिर यांनी बोलताना महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पाठबळावर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.

त्यावेळी अपक्ष आमदारांची गरज नव्हती, तरीही उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळता यावा म्हणून त्यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्री केले.

राजेंद्र यड्रावरकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नव्हते पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी मंत्रिपद दिली. त्यामुळे आता जरी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात असली तरी शिंदे गटावर जो गद्दारीचा शिक्का बसला आहे तो निघून जाणार नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.