AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री घराबाहेर पडले!, आता सर्वांनाच रेल्वे प्रवासाची मुभा द्या, मनसे पदाधिकारी संदीप देशपांडेची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यावरुन मनसे पदाधिकारी संदिप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्याचबरोबर मुंबईत आता सर्वांसाठीच लोकल प्रवास सुरु करण्याची मागणीही देशपांडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री घराबाहेर पडले!, आता सर्वांनाच रेल्वे प्रवासाची मुभा द्या, मनसे पदाधिकारी संदीप देशपांडेची मागणी
sandeep deshpande on cm uddhav thackeray
sagar joshi
sagar joshi | Updated on: Oct 21, 2020 | 11:18 AM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यावरुन मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर आता सर्वांनाच लोकल प्रवासाची परवानगी द्या, अशी मागणीही देशपांडे केली आहे. ‘मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही चांगली गोष्ट आहे, ते बाहेर पडले म्हणजे कोरोना संपला असं म्हणावं लागेल’, अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. (Sandeep deshpande on cm uddhav thackeray visit to osmanabad and local train)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात मातोश्री किंवा वर्षा निवासस्थानावरुन राज्याचा कारभार पाहात होते. संकट काळातही मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत अशी टीका सातत्यानं त्यांच्यावर होत असते. मागील आठवड्यात राज्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. अशा संकटातही मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून सुरु होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी रविवारी सोलापूर तर आज उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केली. हाच धागा पकडत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

‘मुख्यमंत्री इतके दिवस घरी बसून होते. आता बाहेर पडले आहेत. मुंबईत आजपासून सर्वसामान्य महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण हे नियोजन शून्य आहे. कार्यालयाची वेळ सकाळची आणि प्रवासाची मुभा ११ नंतर. याचा उपयोग काय?’ असा सवाल संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारला पर्यायानं मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री घराबाहेर पडत आहेत तर आता सर्वांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या, अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.

आजपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा, वेळमर्यादेवर नाराजी

लोकलमध्ये आता सरसकट सर्व महिलांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून सर्वसामान्य महिला लोकल प्रवास करु शकणार आहेत. पण सरकारच्या वतीनं महिलांना प्रवासासाठी वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रात्री 7 वाजेनंतर लोकल बंद होण्यापर्यंत प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, अनेक महिलांनी सरकारच्या वेळमर्यादेवर नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या:

सर्वसामान्य महिलांसाठी आजपासून लोकल प्रवास, पण वेळमर्यादेचा फायदा कुणाला? महिलावर्गाचा सवाल

मुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे ‘नवरात्री’ गिफ्ट

Sandeep deshpande on cm uddhav thackeray visit to osmanabad and local train

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...