AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनेटायझेशन टनेल, नवी मुंबई एपीएमसीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला बाजारात (New Mumbai APMC Market) निर्जंतुकीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनेटायझेशन टनेल, नवी मुंबई एपीएमसीचा नाविन्यपूर्ण उपक्रम
Chetan Patil
Chetan Patil | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 07, 2020 | 7:05 AM
Share

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला बाजारात (New Mumbai APMC Market) निर्जंतुकीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आज भाजीपाला बाजाराच्या प्रवेशद्वारावर सॅनेटायझेशन टनेल अर्थात निर्जंतुकीकरण यंत्र बसविण्यात आलं. बाजारात जाणारी प्रत्येक व्यक्ती या टनेलमधून प्रवेश करेल. त्यामुळे भाजीपाला बाजारात कोरोना विषाणूंचा प्रसार कमी होईल, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई एपीएमसीचे प्रशासक आणि सचिव अनिल चव्हाण यांनी दिली (New Mumbai APMC Market).

नवी मुंबई एपीएमसी भाजीपाला आणि फळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दर दिवसात हजारोंच्या संख्येने माथाडी कामगार, व्यापारी, ग्राहक ये-जा करतात. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या यंत्रामुळे कोरोना विषाणूंचा फैलाव कमी होईल, अशी प्रतिक्रिया भाजीपाला व्यापारी शंकर पिंगळे यांनी दिली आहे.

बाजारात गर्दी होऊ नये यासाठी बाजारसमिती प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. प्रशासनाने याआधी गाड्यांवर फवारणी, बाजाराबाहेर 500 मीटरपर्यंत बॅरिकेट, बाजाराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, मास्क आदी उपायोजना केल्या आहेत. आता एपीएमसी प्रशासनातर्फे नवीन यंत्र आजपासून बाजाराच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलं आहे.

बाजाराच्या प्रवेशद्वारावर सॅनेटायझेशन टनेल बसवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती या टनेलमधून प्रवेश करुन बाहेर पडेल. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात हा पहिला उपक्रम बाजार समितीतर्फे राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारचे यंत्र प्रामुख्याने इटली, चीनसह अन्य काही विकसित देशांमध्ये आहे.

सध्या एपीएमसी अधिकारी, पोलिस, आरोग्य, महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य तपासणी तथा तत्सम कामे करीत आहे. हायरिस्क झोनमधून परतल्यानंतर त्यांना निर्जंतुक करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरु शकणार आहे.

संबंधित बातम्या :

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

आत्ता लोकांचे जीव वाचवणं गरजेचं, तेलंगणा मुख्यमंत्र्यांची मोदींकडे लॉकडाऊन वाढवण्याची विनंती

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता, परिवहन मंत्र्यांची घोषणा

कोरोनाचा मुकेश अंबानींना सर्वात मोठा फटका, दोन महिन्यात 1.3 लाख कोटींचं नुकसान

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक