AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : मित्रपक्षांनाच फडणवीसांकडून धोका? संजय राऊतांचा तो गंभीर आरोप काय? शिंदेंसह अजितदादांना काय दिला इशारा

Sanjay Raut on Ajit Pawar NCP : ऐसा कोई सगा नही जिसे भाजपने ठगा नही अशी हिंदीतील म्हण खासदार संजय राऊतांच्या तोंडावर पुन्हा आली. त्यांनी महायुतीतील मित्रपक्षांना धोक्याचा इशारा दिला. काय म्हणाले राऊत?

Sanjay Raut : मित्रपक्षांनाच फडणवीसांकडून धोका? संजय राऊतांचा तो गंभीर आरोप काय? शिंदेंसह अजितदादांना काय दिला इशारा
संजय राऊतांचा गंभीर आरोप
| Updated on: Oct 23, 2025 | 11:22 AM
Share

Sanjay Raut on Eknath Shinde Shivsena : खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी वेगळा सूर आळवल्यानंतर त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत या नेत्यांना फटकारले. संविधान, लोकशाही आणि मुंबई वाचवण्यासाठी काँग्रेसने साथ देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी महायुतीमधील मित्रपक्षांना एक धोक्याचा इशारा पण दिला. अर्थात दोन दिवसांपूर्वी त्यांनी याविषयीचे सूतोवाच केले होते. ऐसा कोई सगा नही जिसे भाजपने ठगा नही असे हिंदीतील वाक्य सांगत त्यांनी महायुतीतील मित्रपक्षांना सार सांगण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा फॉर्म्युला समोर येत आहे. तर या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. यात शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. सोलापूरमध्ये ऑपरेशन लोट्स सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीने तिथली आणीबाणीची परिस्थिती थोपवल्याचा दावा केला आहे. अर्थात अनेक भागात असे शीतयुद्ध सुरू आहे. त्यावरून संजय राऊतांनी अचूक निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप

राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असतं. महाराष्ट्रातील बहुमत हे खरं बहुमत नाही. स्वतः फडणवीसांना शिंदेंचा पक्ष फोडायचा आहे. त्याचवेळा अजित पवारांचाही पक्ष फोडायचा आहे. त्याचे भुगर्भातील धक्के सुरू झाले आहेत. हे लक्षात घ्या. फडणवीसांना स्वयंभू राज्य करायचे आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठी भारतीय जनता पक्षातील फडणवीसांचा गट हे कोणतीही भूमिका घेऊ शकतात.

2029 पर्यंत फडणवीस यांनी आपणच मुख्यमंत्री पदी राहणार असल्याचा दावा केला, त्यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यांच्या स्वप्नांवर फडणवीसांनी पाणी फेरल्याचे ते म्हणाले. फडणवीसांना आपण दिल्लीत पाठवू असे शिंदे म्हणत होते. पण भविष्यात दिल्लीच अस्थिर होणार असल्याचा दावा राऊतांनी केला. मी जे फडणवीस यांना ओळखतो, त्यावरून सांगतो की फडणवीस हे शिंदेंचा बंदोबस्तासाठी समर्थ आहेत, असा चिमटा राऊतांनी शिंदेंना काढला.

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.