AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जागावाटपासाठी मविआची 10 तास खलबतं; ठाकरे गटाची तातडीची बैठक; राऊत म्हणाले….

Sanjay Raut on Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक, जागावाटप, महाविकास आघाडीच्या बैठका यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. कोण- कुठे लढणार? याबाबतही संजय राऊतांनी माहिती दिली आहे. राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर....

जागावाटपासाठी मविआची 10 तास खलबतं; ठाकरे गटाची तातडीची बैठक; राऊत म्हणाले....
संजय राऊत, खासदारImage Credit source: ANI
| Updated on: Oct 20, 2024 | 12:50 PM
Share

विधानसभेच्या जागावाटपासाठी काल महाविकास आघाडीची 10 तास बैठक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर माझी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आज साडे बारा वाजता आज शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, असं संजय राऊत म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी भाजप आणि विशेषत : अमित शाह यांच्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.

मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक

परवा दिवशी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता. विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात विदर्भातील जागांवरून वाद झाला आहे. त्यानंतर आता काल 10 तास बैठक झाली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आता या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

राष्ट्रपती राजवट लावून सरकार चालवण्याचा डाव- संजय राऊत

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यावरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे. निवडणुकीनंतर सरकार बनवण्यासाठी केवळ दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. उशीर झाल्यास हे लोक राज्यात सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावतील. राष्ट्रपती राजवट लावून सरकार चालवण्याचा अमित शाह यांचा डाव आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

भाजप जिथं लढणार आहे. त्या 150- 155 जागांवर जे पक्के मतदार आहेत. ज्यांनी लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान केलं आहे. त्यांची नावं मतदार यादीतून काढायचा प्रयत्न सुरु आहे. त्या ऐवजी 10 हजार बोगस नावं टाकायचा प्रयत्न आहे. खोटे आधार कार्ड, मतदान ओळख पत्र यांच्या आधारे बोगस नावं टाकली जात आहेत. केवळ भाजपचे उमेदवार असणार, तिथे हे सगळं चाललं आहे. जे अत्यंत गंभीर आहे, असं राऊत म्हणाले.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.