AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…म्हणून बाळासाहेब यांच्यावर आमचा जो हक्क आहे, तो महापुरुष म्हणून आहे”; शिंदे गटाच्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांना सुनावलं

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंडखोरी बाहेर पडलेल्या आणि ठाकरे गटाने त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारलेला असतानाच शिंदे गटाकडून मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर आपलाच हक्क सांगितला जात आहे.

...म्हणून बाळासाहेब यांच्यावर आमचा जो हक्क आहे, तो महापुरुष म्हणून आहे; शिंदे गटाच्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांना सुनावलं
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 25, 2023 | 5:31 PM
Share

बुलढाणाः राज्यात सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरून चाललेल्या न्यायालयीन लढ्यावरूनही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच निवडणुकांच्या पोस्टरवरुनही जोरदार खडाजंगी चालू असल्याचे दिसून येत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या आमदारांवर गद्दारीचा शिक्का ठाकरे गटाने मारला आहे. त्यामुळे त्यांच्यावर वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला जात असल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे.

त्यामुळे या वादावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाला सुनावताना स्पष्टच सांगितले आहे की, बाळासाहेब ठाकरे हे काही कोणाची खासगी मालमत्ता नाही ते विश्व वंदनीय असून महापुरुष असल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचापण हक्क आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंडखोरी बाहेर पडलेल्या आणि ठाकरे गटाने त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारलेला असतानाच शिंदे गटाकडून मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर आपलाच हक्क सांगितला जात आहे.

शिंदे गटाकडून कोणत्याही कार्यक्रमामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो वापरला जातो. त्यामुळे ठाकरे गटाकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनही हल्ली लोकं दुसऱ्यांचे वडिलही चोरतात अशी टीका करतात.

त्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड म्हणतात की, देशाचा महापुरुष हा कोण्या एकट्याच नसतो. त्यामुळे कोणी कितीही ओरडले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचाच हक्क आहे.

कारण त्यांनी सांगितलेल्या हिंदुत्वासाठीच आम्ही त्यांच्या विचाराने घालून दिलेल्या वाटेवरून चालत आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले. त्यामुळे आमच्या कायदेशीर दृष्ट्या कोणीही काहीही करू शकत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी हल्ली लोकं दुसऱ्यांचे वडिलही चोरतात असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला होता. त्या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आपण आपल्या वडिलांसाठी काय केले, आणि आमच्यासारख्य लोकांनी किती रक्त सांडले हे त्यांनी एकदा पाहावे. शिंदे गटातील हे मावळे सोबत होते, म्हणून बाळासाहेबांचे विचार देशभर पोहचले आहेत या शब्दात त्यांनी त्यांना सुनावले आहे.

Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.