AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bmc Election 2026 : महायुतीच्या विजयामुळे लाडक्या बहि‍णींना मिळणार फायदा! थेट 50 टक्के रक्कम…

Bmc Election Mahayuti Ladki Bahin : राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना दरमहिन्याला 1 हजार 500 रुपये दिले जातात. त्यानंतर आता महायुतीच्या आश्वासनानुसार मुंबईत महापालिकेत विजय झाल्यास लाडक्या बहिणींना मोठा फायदा होणार आहे.

Bmc Election 2026 : महायुतीच्या विजयामुळे लाडक्या बहि‍णींना मिळणार फायदा! थेट 50 टक्के रक्कम...
Devendra FadnavisImage Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Jan 16, 2026 | 8:16 PM
Share

ओबीसी आरक्षण, कोरोना आणि इतर अशा कारणांमुळे राज्यातील महापालिका निवडणुकींना विलंब झाला. त्यामुळे राज्यातील जनतेसह राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले होते. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर ही पहिलीच महापालिकेची निवडणूक होणार होती. त्यामुळे भाजप महायुतीचं लोकसभा, विधानसभेनंतर विशेष करुन मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचं मिशन होतं. तर ठाकरे शिवसेनेसमोर महापालिकेतील सत्ता राखण्याचं आव्हान होतं. राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबरला 2026 रोजी एकूण 29 महापालिका निवडणुंकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि राजकीय पक्ष तयारीला लागले.

भाजप महायुतीला काहीही करुन मुंबई महापालिका (Bmc Election 2026) काबीज करायची होती. त्यामुळे महायुतीने कंबर कसली. तसेच मुंबईतील मराठी मतांचं विभाजन टाळून सत्तेसाठी ठाकरे बंधु एकत्र आले. ठाकरे बंधुंसाठी मुंबई पालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि राजकीय अस्तित्वाची झाली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत कोणत्या राजकीय आघाडीचा महापौर बसणार? याकडे राजकीय वर्तुळाची करडी नजर होती. मात्र आता भाजप+शिंदेंच्या महायुतीला मतदारांनी सर्वाधिक जागांवर विजय मिळवून दिलाय. त्यामुळे आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यास राज्य सरकारच्या लाडक्या बहि‍णींनाही आनंदाची बातमी मिळणार आहे. महायुतीला स्पष्ट बहुमतानंतर मुंबईतील लाडक्या बहि‍णींना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी गूड न्यूज

महायुतीचा विजय झाल्यास आता मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसमध्ये महिलांना तिकीटात 50 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या लाडक्या बहि‍णींना महायुतीचा विजय झाल्यास आता दरमहा 1 हजार 500 रुपयांसह बेस्ट बस प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे बेस्ट बसमधून प्रवास करताना लाडक्या बहिणींच्या खिशातील 50 टक्के रक्कम वाचणार आहे. एकूणच लाडक्यांचा 50 टक्के फायदा होणार आहे.

महायुतीची घोषणा काय होती?

महायुतीकडून 11 जानेवारीला वचननामा जाहीर करण्यात आला. महायुतीकडून आरोग्य, शिक्षण,मुलभूत सुविधा आणि युवांना समोर ठेऊन वचननामा तयार करण्यात आला होता. महायुतीने या वचननाम्यात सत्तेत आल्यास नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट बसमध्ये काय बदल करणार? याचं आश्वासन दिलं होत. महायुतीने या वचननाम्यातून महिलांना बेस्ट बस प्रवासात 50 टक्के सवलत देणार असल्याचा शब्द दिला होता. आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना बेस्ट बसमधून अर्ध्या तिकीटात केव्हापासून प्रवास करायला मिळणार? याची प्रतिक्षा असणार आहे

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.