भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, ‘ठाकरेंचं सरकार उखडून फेका’, राऊत म्हणतात, ‘दुसऱ्यांना उखडता-उखडता…’
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना दिले. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना दिले. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना?, असा सवाल विचारत जरा जपून बोलण्याचा सल्ला राऊतांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका, मग महाराष्ट्र विकास आघाडी उखडायची भाषा करा. सतत दोन वर्षे शर्थ करूनही ठाकरे सरकार मजबूत आहे. दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना? तेव्हा जरा जपून!
अगोदर चीनने वसवलेलं गाव उखडा
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अत्यंत राष्ट्रहिताचे, राष्ट्रीय सुरक्षेचे, महागाईविरोधी असे विचार ठणकावून व्यक्त केले म्हणजे काय? महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका, असा फुसका बॉम्ब त्यांनी फेकला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका,
भाजप जनतेचा विश्वास जिंकेल, असे मनोगत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत व्यक्त केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नक्की काय घडेल याविषयी बरेच तर्कवितर्क होते, पण पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या यावरच प्रामुख्याने चर्चा झाली. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका जिंकू म्हणजे जिंकूच, असाच राष्ट्रीय कार्यकारिणीचा सूर होता.
राजकारण, सत्ता, मोदींचे भजन-कीर्तन याशिवाय राष्ट्रीय बैठकीत काहीच घडलं नाही
पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत असे ठरले की, देशात 10 लाख 40 हजार पोलिंग बूथ आहेत आणि 25 डिसेंबरपर्यंत प्रत्येक बूथ स्तरावर भाजपची कमिटी बनवली जाईल. तेथून पंतप्रधानांची ‘मन की बात’ जनतेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल. एकंदरीत राष्ट्रीय बैठकीत राजकारण, सत्ता, मोदींचे भजन-कीर्तन याशिवाय काहीच घडले नाही.
(Shivsena Sanjay Raut reply BJP JP Nadda Through Saamana Editorial Over BJP New Delhi national Session)
हे ही वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेसची गुंडागर्दी सहन करणार नाही, आमदार पडळकरांना तत्काळ संरक्षण द्या : सदाभाऊ खोत