AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळश्या, हंडे, बादल्या आताच भरून ठेवा! दक्षिण मुंबईत दोन दिवस पाणीबाणी, महापालिकेचं आवाहन काय?

मुंबईकरांनो 15 तारखेला घरातील पाण्याचा साठा वाढवा. दोन दिवस पाणी येणार नसल्यामुळे पाणी जपून वापरा. आता कोणत्या कोणत्या भागांमध्ये दोन दिवस पाणी येणार नाही? चला जाणून घेऊया...

कळश्या, हंडे, बादल्या आताच भरून ठेवा! दक्षिण मुंबईत दोन दिवस पाणीबाणी, महापालिकेचं आवाहन काय?
water cut in mumbaiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 12, 2026 | 8:30 AM
Share

दक्षिण मुंबईतील नागरिकांना येत्या १६ आणि १७ एप्रिल रोजी पाणीपुरवठ्यात मोठी अडचण येणार आहे. मुंबई महानगरपालिके (बीएमसी)ने मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी १८ तासांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो 15 तारखेला घरातील पाण्याचा साठा वाढवा. दोन दिवस पाणी येणार नसल्यामुळे पाणी जपून वापरा. आता कोणत्या कोणत्या भागांमध्ये दोन दिवस पाणी येणार नाही? चला जाणून घेऊया…

या पाणी कपातीचा परिणाम A, B, C, E आणि F-South विभागांतील अनेक भागांवर होणार असून, परळ, लालबाग, दादर, भायखळा आणि कुलाबा परिसरातील नागरिकांना काही काळ पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कधी आणि किती वेळ बंद?

बीएमसीच्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून १७ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत म्हणजे सुमारे १८ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, झडप बदलणे आणि इतर तांत्रिक तपासणीची महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.

बीएमसीचे आवाहन

बीएमसी प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, ते आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवावे. पाण्याचा जपून वापर करावा आणि अनावश्यक वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल.

का घेतला निर्णय?

ही पाणी कपात मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी आवश्यक असल्याचे बीएमसीने सांगितले आहे. नियमित देखभाल कामांमुळे पाणीपुरवठा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि सुरळीत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

नागरिकांना सल्ला:

-१५ एप्रिलपर्यंत घरात पुरेसे पाणी साठवून ठेवा

-पाण्याचा मिती वापर करा

-दुरुस्ती काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल याची नोंद घ्या

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....