AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळश्या, हंडे, बादल्या आताच भरून ठेवा! दक्षिण मुंबईत दोन दिवस पाणीबाणी, महापालिकेचं आवाहन काय?

मुंबईकरांनो 15 तारखेला घरातील पाण्याचा साठा वाढवा. दोन दिवस पाणी येणार नसल्यामुळे पाणी जपून वापरा. आता कोणत्या कोणत्या भागांमध्ये दोन दिवस पाणी येणार नाही? चला जाणून घेऊया...

कळश्या, हंडे, बादल्या आताच भरून ठेवा! दक्षिण मुंबईत दोन दिवस पाणीबाणी, महापालिकेचं आवाहन काय?
water cut in mumbaiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 12, 2026 | 8:30 AM
Share

दक्षिण मुंबईतील नागरिकांना येत्या १६ आणि १७ एप्रिल रोजी पाणीपुरवठ्यात मोठी अडचण येणार आहे. मुंबई महानगरपालिके (बीएमसी)ने मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी १८ तासांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो 15 तारखेला घरातील पाण्याचा साठा वाढवा. दोन दिवस पाणी येणार नसल्यामुळे पाणी जपून वापरा. आता कोणत्या कोणत्या भागांमध्ये दोन दिवस पाणी येणार नाही? चला जाणून घेऊया…

या पाणी कपातीचा परिणाम A, B, C, E आणि F-South विभागांतील अनेक भागांवर होणार असून, परळ, लालबाग, दादर, भायखळा आणि कुलाबा परिसरातील नागरिकांना काही काळ पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कधी आणि किती वेळ बंद?

बीएमसीच्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून १७ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत म्हणजे सुमारे १८ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, झडप बदलणे आणि इतर तांत्रिक तपासणीची महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.

बीएमसीचे आवाहन

बीएमसी प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, ते आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवावे. पाण्याचा जपून वापर करावा आणि अनावश्यक वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल.

का घेतला निर्णय?

ही पाणी कपात मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी आवश्यक असल्याचे बीएमसीने सांगितले आहे. नियमित देखभाल कामांमुळे पाणीपुरवठा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि सुरळीत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

नागरिकांना सल्ला:

-१५ एप्रिलपर्यंत घरात पुरेसे पाणी साठवून ठेवा

-पाण्याचा मिती वापर करा

-दुरुस्ती काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल याची नोंद घ्या

Follow Us
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.