AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?; कुणाला म्हणाल्या?

मनसे धारावी पॅटनबाबत का बोलत नाही? अंगावर केस नसली तरी काही फरक पडत नाही. फक्त वाया गेलेली केस असू नये, असा हल्लाही त्यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता चढवला.

ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?; कुणाला म्हणाल्या?
ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 02, 2022 | 10:29 AM
Share

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिमिक्री केली. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांना डिवचलंही. तसेच आपण केलेली आजवरची सर्व आंदोलने यशस्वी झाली आहेत. इतर पक्षांपेक्षा आपल्या आंदोलनाच्या यशाचा रेट सर्वाधिक आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.

मुलुंडमध्ये काल महाप्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या खणखणीत भाषणातून राज ठाकरे यांचा समाचार घेतानाच त्यांच्या आंदोलनाची खिल्लीही उडवली. राज ठाकरे यांचे टोलचे आंदोलन म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं होतं. सब मॅनेज किया. वडापाव गाडी, गरीबांवर जोर जबर दाखवत आहेत. पण इमारतीत व्यवसाय करणाऱ्यांवर कधी जोर दाखवणार? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

मनसे धारावी पॅटनबाबत का बोलत नाही? अंगावर केस नसली तरी काही फरक पडत नाही. फक्त वाया गेलेली केस असू नये, असा हल्लाही त्यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता चढवला. उद्धव ठाकरे यांच्या आजारावर कोणी नाटक करत असेल तर त्याला चक्र व्याजा सकट उत्तर दिले जाईल, असा इशाराच त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. महिलांचे प्रश्न ऐरणीवर असताना देखील देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नाही. त्यावेळी तुमच्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही घरी बसा, अशी टीका त्यांनी केली.

ईडीचा दुरुपयोग करून एक एक पक्ष संपवला जात आहे. भाजपला शिवसेना नाहीतर सर्व पक्ष संपवायचे आहेत. विरोधी पक्ष संपला तर काहीच राहणार नाही. सत्तेसाठी शिवसेनेने हट्ट केला नाही, तर आम्ही आकांडतांडव केलं असतं. शिवसेना लढणार आणि लढत राहणार. प्रबोधनकार यांची साक्ष आहे, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.