AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्यांना स्वतः निवडून येता येत नाही, त्यांनी यावर बोलू नये”; ठाकरे गटाने नारायण राणेंना केलं लक्ष्य…

नारायण राणे यांना स्वतः निवडून येता येत नाही त्यांनी यावर बोलू नये अशी जोरदार टीका त्यांच्यावर करण्यात आली.

ज्यांना स्वतः निवडून येता येत नाही, त्यांनी यावर बोलू नये; ठाकरे गटाने नारायण राणेंना केलं लक्ष्य...
| Updated on: Jan 23, 2023 | 5:26 PM
Share

मुंबईः बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि शिंदे-फडणवीस सरकारने बाळासाहेब यांचे तैलचित्र लावल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंद गटाबरोबर भाजपलाही लक्ष्य करत त्यांनी राज्यासह केंद्रातील भाजप आता बदलली असल्याचा ठपका भास्करराव जाधव यांनी ठेवला आहे. भास्करराव जाधव आणि संजय पवार या ठाकरे गटाच्या नेत्यांमुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात आणि देशात असलेला भाजप पक्ष आता पूर्वीसारखा राहिला नाही. भाजप आता सत्तेनं उन्मत्त झालेली पक्ष असल्याची बोचरी टीका भास्करराव जाधव यांनी केली आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पंडीत नेहरुंचा फोटो लावलेला चालणार नाही अशा पद्धतीची आताची भाजप झाली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

अशा प्रकारचा भाजप पक्ष झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात तसं नया भारत तसं ही नया भाजपा झाला आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

भाजपवर सडकून टीका करताना भास्करराव जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणे हा राजकीय शक्तीपात झालेला माणूस आहे. त्यामुळे त्यांनी शक्तीविषयी बोलू नये.

निवडणुकीवरूनही त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली आहे. नारायण राणे यांना स्वतः निवडून येता येत नाही त्यांनी यावर बोलू नये अशी जोरदार टीका त्यांच्यावर करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रत्येकवेळी महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरवेळी नव्या नव्या महापुरुषांबद्दल बोलून त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा करावा तेवढा उपमर्द केला आहे अशी जोरदार टीका भास्करराव जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली.

नाना पटोले म्हणतात तेच खरं आहे कारण राजीनामा देण्याची इच्छा त्यांनी राष्ट्रपतींकडे करायला हवी होती, त्यानंतर त्यांचा राजीनामा नाट्यावर पडदा पडला असता असा टोलाही त्यांनी राज्यपालांना लगावला आहे.

ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.