AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udhav Thackeray : सध्याचा कालखंड लोकशाहीसाठी मारक, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, त्या लेखात अजून काय?

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीसह विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा उघडलेला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. सध्याचा कालखंड लोकशाहीसाठी मारक असल्याची टीका त्यांनी केली.

Udhav Thackeray : सध्याचा कालखंड लोकशाहीसाठी मारक, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, त्या लेखात अजून काय?
उद्धव ठाकरेंची टीका
| Edited By: | Updated on: Oct 29, 2025 | 12:11 PM
Share

विरोधी पक्षांनी मत चोरीवरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. राज्यात शेतकऱ्यांचंही आंदोलन सुरू आहे. सरकारविरोधात वातावरण तापवण्यात येत आहे. अनेक घटनांवरून सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी एका लेखातून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सध्याचा कालखंड लोकशाहीसाठी मारक असल्याची टीका केली. शिवविधी दर्पणच्या अंकात त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहेत. त्यात महायुती सरकारला लक्ष्य केले आहे.

सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा

लोकशाहीत मत आणि विरोध व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, आजच्या सत्ताधाऱ्यांना ते मान्य नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या शिव विधी व न्याय सेनेच्या शिवविधी दर्पणच्या अंकात उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले.शिव विधी न्याय विभागाचा काल वर्धापन दिन झाला. या निमित्ताने अंकाचे अनावरण करण्यात आलं यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

अधिकारांवर आक्रमण करणारे कायदे

शिवसेनाप्रणीत शिव विधी आणि न्याय सेनेने आता चांगलेच बाळसे धरले आहे. त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती माझ्यापर्यंत येत असते. विशेषतः अनेक विषयांवर पुढाकार घेऊन समाजाला मदत होईल अशी कृती त्यांच्याकडून होत आहे. सध्याचा कालखंड लोकशाहीला मारक आहे. राजकीय कार्यकर्त्याच्या अधिकारांवर आक्रमण करणारे कायदे बनविले जात आहेत असा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला.

व्यक्तीस्वातंत्र्याची पूर्ण गळचेपी सत्तेच्या यंत्रणांमार्फत सुरू असताना, शिवसेनाप्रणीत न्याय-विधी सेनेला भविष्यात अनेक लढे लढावे लागतील. लोकशाहीत मत आणि विरोध व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, आजच्या सत्ताधाऱ्यांना ते मान्य नाही.अशा वेळी कायद्याचे रखवालदार म्हणून वकील मंडळीना निर्भयपणे पुढे यावे लागेल. लोकांना जागरूक करावे लागेल. लढणाऱ्या सामान्य जनांवरील अन्याय दूर करण्यासाठी विधी व न्याय सेनेला झटावे लागेल असे आवाहन त्यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच महायुतीविरोधात आरोपांना आणि विरोधाला चांगलीच धार आल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच ठाकरेंच्या लेखणीला पण धार आल्याचे दिसून येत आहे.

1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा

दरम्यान 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर विरोधी पक्ष मोर्चा काढणार आहे. मतदार यादीतील घोळाविरोधात हा मोर्चा निघणार आहे. मुंबईत विराट मोर्चा काढण्याचा संकल्प महाविकास आघाडीसह मनसेने सोडला आहे. त्यापूर्वी या पक्षांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. त्यात मोर्चाचे नियोजन करण्यात येईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...