AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मायानगरीत अजून एक मायावी पूल! देशातील सर्वात लांब फ्लायओव्हरवरुन करा लवकरच प्रवास

SEA Flyover | मुंबईत अनेक प्रकल्प सुरु आहेत. काहीचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर उतारा शोधण्यासाठी अनेक अभिनव प्रयोग करण्यात येत आहे. वरळी सी-लिंकची चर्चा झाली. इतर पण अनेक प्रकल्प निर्माणाधीन आहे. त्यात आता देशातील या सर्वात लांब सी-लिंकची पण चर्चा होत आहे.

मायानगरीत अजून एक मायावी पूल! देशातील सर्वात लांब फ्लायओव्हरवरुन करा लवकरच प्रवास
| Updated on: Mar 20, 2024 | 9:56 AM
Share

मुंबई | 20 March 2024 : चोहो बाजूंनी विशालकाय समुद्र आणि त्यामधून तुमची सूसाट धावणारी कार, काय मज्जा येईल , नाही? ते पण 10-20 किलोमीटर नाही तर 43 किलोमीटरचा हा नजारा तुमच्या डोळ्याचे पारणे फेडल्याशिवाय राहणार नाही. नुसत्या विचारानेच तुमच्या अंगावर रोमांच उठले असतील. पण मायानगरीत लवकरच हा मायावी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एका टोकावरील उपनगरवासीय अवघ्या काही मिनिटांत मुंबईत दाखल होतील. जवळपास अडीच तासांचे अंतर अवघ्या 30 मिनिटांत कापल्या जाईल.

देशातील सर्वात लांबीचा उड्डाणपूल

मुंबईतील आतापर्यंतचा हा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प आहे. लवकरच त्याची सुरुवात होईल. या प्रकल्पाच्या अर्ध्या टप्प्याला अगोदरच मंजूरी मिळाली आहे. राज्य सरकारने त्याला मंजूरी दिली आहे. मुंबईत वर्सोवा ते विरारपर्यंत फ्लायओव्हरमुळे जोडल्या जाईल. हे 43 किलोमीटर अंतर आहे. तर हा प्रकल्प पुढे पालघरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. समुद्रातील हा उड्डाणपूल देशातील सर्वाधिक लांबीचा असेल.

लवकरच कामाचा श्रीगणेशा

वर्सोवा ते विरार हा प्रवास मुंबईकरांना घामाटा फोडणारा आहे. दोन्ही शहरातील अंतर जवळपास 58 किलोमीटर आहे. या दरम्यान वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास पूर्ण होण्यासाठी जवळपास 2.50 तासांहून अधिकचा काळ लागतो. नवीन उड्डाणपूल हा या समस्येवरचा तोडगा आहे. या उड्डाणपुलामुळे विरार ते वर्सोवा हे अंतर अवघ्या 30 मिनिटात कापता येईल.

8 पदरी उड्डाणपूल

हा उड्डाणपूल ना केवळ देशातील सर्वात लांब समूद्र पूल असेल पण रुंदीतही तो भाव खाऊन जाणार आहे. हा उड्डाणपूल 8 पदरी असेल. या उड्डाणपुलासाठी जवळपास 64 हजार कोटी रुपये खर्चाची शक्यता आहे. फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूंनी 4-4 मार्गिका असतील. या समुद्र मार्गवर चारकोप, मीरा भायंदर आणि वसाई सारखी मोठी उपनगर जोडण्यात येतील.

समुद्रात एक किलोमीटर आत फ्लायओव्हर

हा फ्लायओव्हर समुद्रात एक किलोमीटर आत असेल. हा प्रकल्प कधी पूर्ण करण्यात येणार, याची डेडलाईन अजून समोर आलेली नाही. पण पुढील 6 ते 7 वर्षात हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21.8 किलोमीटर लांब अटल सेतूचे उद्धघाटन केले होते.

Follow Us
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा