AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat : जूनपासून २८ राज्यांमध्ये धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई- गोवा कधी सुरु होणार

Vande Bharat Express : रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्रातून लवकरच चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. जून महिन्यात ती सुरु होणार आहे. तसेच २८ राज्यातून वंदे भारत एक्स्प्रेस जून महिन्यापासून धावणार आहे.

Vande Bharat : जूनपासून २८ राज्यांमध्ये धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई- गोवा कधी सुरु होणार
vande-bharat-expressImage Credit source: socialmedia
| Updated on: May 27, 2023 | 2:42 PM
Share

मुंबई : भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात अनेक मार्गावरुन धावू लागली आहे. या गाडीची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी ती सुरु करण्याची मागणी केली जात आहे. आता महाराष्ट्रातून लवकरच चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली. तसेच मुंबईवरुन शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. आता चौथी गाडी मुंबई-गोवा सुरु होणार आहे.

आसाममध्ये सुरु होणार

स्वदेशी तंत्रज्ञानाने बनलेली सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस सध्या २१ राज्यांमधून धावत आहे. बिहार, झारखंड अन् गोव्यामधून ती धावत नाही. सरकारने जून महिन्यात देशातील २८ राज्यांमधून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याचे म्हटले आहे. पूर्वीकडील राज्यांमध्ये अजून विद्युतीकरण झाले नाही. त्यामुळे त्याठिकाणांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होऊ शकत नाही. परंतु आसाममधून पुढील आठवड्यात वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी जाणार आहेत.

पहिली कुठे झाली होती सुरु

पहिली वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली होती. त्यानंतर दिल्ली ते जम्मू सुरु झाली होती. सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, गुजरात, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशसह दक्षिण भारतातून ही रेल्वे धावत आहे. देशातील 21 राज्यांमधून तिचा प्रवास सुरु आहे.

मुंबई गोवा कधी होणार सुरु

कोकण रेल्वे मार्गावरून १६ मे रोजी वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन यशस्वी झाली. मुंबईवरुन गोव्यासाठी १६ डब्यांची एक्स्प्रेस सुसाट धावली. आता ही गाडी जून महिन्यात सुरु होणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. तेजस एक्स्प्रेसपेक्षाही कमी वेळ या गाडीने घेतला होता.

मुंबई ते गांधीनगर ट्रेन

  • मुंबई सेंट्रेलवरुन सकाळी 6:00 वाजता सुटेल आणि गांधीनगरला 12:25 वाजता पोहचणार आहे.
  • गांधीनगरवरुन दुपारी 2:05 वाजता सुटेल तर मुंबईत रात्री 8:25 ला पोहचणार आहे.
  • मुंबई ते गांधीनगर अंतर : 522 km

मुंबई ते गांधीनगर भाडे

  • AC Chair car (CC) : 1255
  • Exec. Chair Car (EC) : 2435
  • गांधीनगर ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1420
  • Exec. Chair Car (EC) : 2630

मुंबई ते सोलापूर वंदे भारत

  • मुंबईवरुन दुपारी 4.05 वाजता सुटते तर सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी संध्याकाळी 7.10 मिनिटांनी पोहचते.
  • सोलापूरवरुन सकाळी 6:05 वाजता सुटते तर मुंबईत दुपारी 12:35 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी सकाळी 9:15 वाजता येते.
  • मुंबई ते सोलापूर अंतर 455

मुंबई ते सोलापूर भाडे

  • AC Chair car (CC) : 1255
  • Exec. Chair Car (EC) : 2435
  • सोलापूर ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1150
  • Exec. Chair Car (EC) : 2185

मुंबई ते साईनगर (शिर्डी)

  • मुंबईवरुन सकाळी 6:20 वाजता सुटते, शिर्डीला 11:40 वाजता पोहचते.
  • शिर्डीवरुन संध्याकाळी 5:25 वाजता सुटते आणि मुंबईला रात्री 10:50 वाजता पोहचते.
  • मुंबई ते शिर्डी अंतर 343
  • मुंबई ते शिर्डी भाडे
  • AC Chair car (CC) : 975
  • Exec. Chair Car (EC) : 1840
  • शिर्डी ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1130
  • Exec. Chair Car (EC) : 2020
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.