AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे, या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी
| Updated on: May 10, 2025 | 5:36 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, यामध्ये 25 भारतीय तर एका नेपाळी नागरिकाचा समावेश होता. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पाउलं उचलली, सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले,  त्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे.

पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न होत आहे, मात्र भारताकडून हे हल्ले परतून लावण्यात आले आहेत. प्रत्युत्तर म्हणून भारतानं देखील पुन्हा एकदा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली आहे, या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत उद्यापासून फटाके आणि रॉकेट उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 11 मे पासून ते 9 जूनपर्यंत मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे, या संदर्भात मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.

पाकिस्तानकडून कुरापती सुरूच 

दरम्यान पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, भारतानं हा हल्ला परतून लावला, त्यानंतर भारतानं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला, पाकिस्तानच्या 15 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आले, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली, मात्र त्यानंतर देखील पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, सीमा भागामध्ये देखील पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. भारताकडून देखील पाकिस्तानच्या या कृतीला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे, भारतानं केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसानं झालं आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.