AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडले? बाळासाहेब थोरात यांनी थेट सांगितले

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ही चुकीची यादी घेऊन निवडणुका घेणे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडले? बाळासाहेब थोरात यांनी थेट सांगितले
| Updated on: Oct 15, 2025 | 1:50 PM
Share

राज्यात सध्या मतदार याद्यांचा गोंधळ सुरु आहे. आता याप्रकरणी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. या बैठकीनंतर नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ही चुकीची यादी घेऊन निवडणुका घेणे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीतही घोळ 

आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मतदार यादीतील दोषांकडे लक्ष वेधले होते, परंतु आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. परिणामी, ती निवडणूक दोषासहीत झाली. आमदार सांगतात, की २० हजार मतदान बाहेरून आणले गेले. काहींची नावे वगळली गेली, तर तीच नावे वारंवार दिसत आहेत. हॉस्टेलमध्ये राहणारे बाहेरच्या राज्यातील लोकही मतदार म्हणून दाखवले जात आहेत. अशा अनेक घोटाळ्यांनी भरलेली मतदार यादी विधानसभा निवडणुकीत होती, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.

केंद्राची जबाबदारी

बाळासाहेब थोरात यांनी यादीतील त्रुटींवर काम न झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. गेल्या सहा-सात महिन्यात यादीचे पुनर्विलोकन करण्यात आले नाही, दुरुस्ती झाली नाही. केंद्राची जबाबदारी होती, त्यांनी ते केले नाही. तर राज्य निवडणूक आयोग म्हणतो, आमचा संबंध नाही. त्यामुळे याच दोषी यादीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे चित्र आहे, जे योग्य नाही, असे मत थोरात यांनी मांडले.

हे निकोप लोकशाहीसाठी घातक

आम्ही निवडणूक आयुक्तांना भेटलो. पण आमचे समाधान झाले नाही. निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही. या चुकीच्या यादीसोबतच निवडणूक होणार आहे. हे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे. राहुल गांधी यांनी हा मुद्दा देश पातळीवर मांडला, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. कॉलेजच्या मालकांकडून बाहेरून आलेल्या लोकांची नावेही मतदार म्हणून यादीत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला. त्यामुळे मतदार यादीतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा : निवडणुका कशाला घेता, त्यापेक्षा थेट ठराविक… उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावले

अजित पवारांच्या गटाला धक्का, आमदाराकडून पालकमंत्रिपदाचा राजीनामा, कारणही सांगितले

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.