AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडले? बाळासाहेब थोरात यांनी थेट सांगितले

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ही चुकीची यादी घेऊन निवडणुका घेणे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडले? बाळासाहेब थोरात यांनी थेट सांगितले
| Updated on: Oct 15, 2025 | 1:50 PM
Share

राज्यात सध्या मतदार याद्यांचा गोंधळ सुरु आहे. आता याप्रकरणी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. या बैठकीनंतर नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ही चुकीची यादी घेऊन निवडणुका घेणे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीतही घोळ 

आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मतदार यादीतील दोषांकडे लक्ष वेधले होते, परंतु आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. परिणामी, ती निवडणूक दोषासहीत झाली. आमदार सांगतात, की २० हजार मतदान बाहेरून आणले गेले. काहींची नावे वगळली गेली, तर तीच नावे वारंवार दिसत आहेत. हॉस्टेलमध्ये राहणारे बाहेरच्या राज्यातील लोकही मतदार म्हणून दाखवले जात आहेत. अशा अनेक घोटाळ्यांनी भरलेली मतदार यादी विधानसभा निवडणुकीत होती, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.

केंद्राची जबाबदारी

बाळासाहेब थोरात यांनी यादीतील त्रुटींवर काम न झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. गेल्या सहा-सात महिन्यात यादीचे पुनर्विलोकन करण्यात आले नाही, दुरुस्ती झाली नाही. केंद्राची जबाबदारी होती, त्यांनी ते केले नाही. तर राज्य निवडणूक आयोग म्हणतो, आमचा संबंध नाही. त्यामुळे याच दोषी यादीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे चित्र आहे, जे योग्य नाही, असे मत थोरात यांनी मांडले.

हे निकोप लोकशाहीसाठी घातक

आम्ही निवडणूक आयुक्तांना भेटलो. पण आमचे समाधान झाले नाही. निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही. या चुकीच्या यादीसोबतच निवडणूक होणार आहे. हे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे. राहुल गांधी यांनी हा मुद्दा देश पातळीवर मांडला, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. कॉलेजच्या मालकांकडून बाहेरून आलेल्या लोकांची नावेही मतदार म्हणून यादीत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला. त्यामुळे मतदार यादीतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा : निवडणुका कशाला घेता, त्यापेक्षा थेट ठराविक… उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावले

अजित पवारांच्या गटाला धक्का, आमदाराकडून पालकमंत्रिपदाचा राजीनामा, कारणही सांगितले

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक