AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : अजितदादा आणि संजय राऊत यांच्यात जुंपली; खालच्या पातळीवरील टीकेचा अजितदादांकडून कडक शब्दात समाचार

थुंकण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आमनेसामने आले आहेत. ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. आम्ही खूप काही भोगलंय, अशा शब्दात राऊत यांनी अजितदादांना सुनावलं आहे.

Video : अजितदादा आणि संजय राऊत यांच्यात जुंपली; खालच्या पातळीवरील टीकेचा अजितदादांकडून कडक शब्दात समाचार
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 03, 2023 | 1:36 PM
Share

नागपूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे मीडियासमोर बोलताना थुंकले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊत यांना कानपिचक्या दिल्या. त्यामुळे राऊत आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं असं राऊत म्हणाले. तर राऊत काहीही बोलल्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, असं अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवार हे मीडियाशी बोलत होते. आता त्यावर राऊत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संजय राऊत यांच्या विधानाबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर आधी त्यांनी नो कमेंट्स म्हणत बोलण्यास नकार दिला. मात्र, नंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या बोलण्याने आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. ही आपली संस्कृती नाहीये. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मला त्याबद्दल बोलायचंच नाही, असं अजित पवार म्हणाले.

राऊत काय म्हणाले होते?

धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं कधीही चांगलं. संयम राखणं ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचा आदरच करतो. पण ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. आम्ही भोगतो आहोत, अशा खोचक शब्दात राऊत यांनी टीका करतानाच संतापही व्यक्त केला. तसेच अजितदादांच्या भाजपसोबत जाण्याबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. एवढं सर्व भोगूनही आम्ही आमच्याच पक्षात आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा विचारही शिवत नाही. संकट आलं म्हणून भाजपसोबत जाण्याचा विचारही आमच्या मनातयेत नाही, असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.

अजित पवार काय म्हणाले होते?

त्यापूर्वी अजित पवार यांनी राऊत यांना कानपिचक्या दिल्या होत्या. नेत्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, परंपरेचं पालन करायला पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो. ते उभ्या देशाला दाखवून दिलंय. प्रत्येकांनी तारतम्य ठेऊन वागावं, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. तसेच मला दुसरी बाजू एकायला मिळाली. त्यात संजय राऊत यांनी म्हटलं काही त्रास होता त्यामुळे ते केलं. माझा थुकण्याचा उद्देश नव्हता असं त्यांनी सांगितलंय, असंही अजित पवार म्हणाले होते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.