AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole : भाजपच्या गर्विष्ठ वृत्तीमुळं राज्यात घटनात्मक पेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

संविधानातील पक्षीय स्वातंत्र्यावर मी बोलतो आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे असंविधानिक असल्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयानं मांडल्याचंही पटोले यांनी सांगितलं.

Nana Patole : भाजपच्या गर्विष्ठ वृत्तीमुळं राज्यात घटनात्मक पेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Aug 04, 2022 | 3:19 PM
Share

मुंबई : घटनात्मक पेच भाजपच्या गर्विष्ठपणामुळे आणि हुकुमशाही वृत्तीमुळं निर्माण झालाय, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (State President of Congress) नाना पटोले यांनी केली. त्याचाच परिणाम आपल्याला सर्वोच्च न्यायालयातही पाहायला मिळतोय. शेड्यूल दहाचा एकप्रकारचा नियम न माननं म्हणजे संविधानाला न माननं होय, अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे केंद्राच्या इशाऱ्यावर काम करतात. संविधानाच्या नियमांना न पाळणं हाच महाराष्ट्राच्या (Maharashtra) राज्यपालांचा गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो. त्याचे पडसाद सर्वोच्च न्यायालयात पाहायला मिळाले आहेत.

संविधानिक नियमांचं पालन व्हावं

लोकशाही वाचविणे हे सरकारचं आणि न्यायव्यवस्थेचं दायित्व आहे. लोकशाहीच्या नियमांचं रक्षण होईल, अशी अपेक्षा न्यायव्यवस्थेकडून आहे. शेड्यूल दहा च्या पारा दोनमधील पक्षांतर विरोधी कायद्यातील तरतुदींच्या आधारावर हा निकाल येईल, अशी अपेक्षा आहे. न्यायालयात काय वादविवाद होतात, हा विषय नाही. संविधानिक नियमांचा हा विषय आहे. कोणी काय वादविवाद करावं हा नंतरचा भाग आहे. पण, संविधानाच्या नियमांचं पालन झालं पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचं नाना पटोले म्हणाले.

पक्षांना चिन्ह वाटपाचा अधिकार निवडणूक आयोगाचा

संविधानातील पक्षीय स्वातंत्र्यावर मी बोलतो आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे असंविधानिक असल्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयानं मांडल्याचंही पटोले यांनी सांगितलं. चिन्ह वाटपाचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळं न्यायालयानं निवडणूक आयोगाला निर्देश देणं स्वाभाविक आहे.

निवडणुका मुद्दाम लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न

नाना पटोले प्रभाग रचनेवर म्हणाले, आधीच्या प्रभाग रचनेवेळी काँग्रेसचं ऐकलं गेलं नाही. मात्र सरपंच, नगराध्यक्ष निवडणूक थेट होत असेल तर महापौर, मुख्यमंत्र्यांची निवडही थेट करा, असंही पटोले म्हणाले. निवडणुका मुद्दाम लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला. मंत्रिमंडळ विस्तारावरही अद्याप तारीख निघालेली नाही. दोन मंत्र्यांचं हे सरकार आहे. त्यातही घटनात्मक पेच निर्माण झालाय. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. संविधानानुसार योग्य तो निर्णय न्यायालयात होईल, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?