AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकमंत्री विजय वडेट्टीवारांची बैलबंडीवरून मिरवणूक, पिपरी गावात केला रात्री मुक्काम, गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

चंद्रपूर तालुक्यातलं दोन हजार लोकसंख्या असलेलं पिपरी हे गाव चंद्रपूरवरून 20 किमी अंतरावर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल रात्री साडेआठ वाजता गावात हजेरी लावली. त्यामुळं गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. जल्लोषात त्यांनी पालकमंत्र्यांचं स्वागत केलं.

पालकमंत्री विजय वडेट्टीवारांची बैलबंडीवरून मिरवणूक, पिपरी गावात केला रात्री मुक्काम, गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 20, 2021 | 10:13 AM
Share

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातले पिपरी हे छोटसं गाव. तिथंल्या गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काल रात्री खुद्द पालकमंत्री विजय वडेट्टीवार गावात पोहचले. गावकऱ्यांनी त्यांना बैलबंडीवर बसवून त्यांची मिरवणूक काढली. पालकमंत्र्यांनी गावातल्या समस्या सोडविण्याचं आश्वासन दिलं.

चंद्रपूर तालुक्यातलं दोन हजार लोकसंख्या असलेलं पिपरी हे गाव चंद्रपूरवरून 20 किमी अंतरावर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल रात्री साडेआठ वाजता गावात हजेरी लावली. त्यामुळं गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. जल्लोषात त्यांनी पालकमंत्र्यांचं स्वागत केलं.

सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळावा

गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांची चक्क बैलबंडीवरून मिरवणूक काढली. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिके आहेत. सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. कापसाची काही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळं सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळावा, अशी स्थानिकांनी मागणी केली. मंत्री गावात आल्यानं गावकरी जाम खूश होते.

काँग्रेसतर्फे जनसंवादचे आयोजन

स्थानिकांनी आपल्या विविध समस्या पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यापुढं मांडल्या. काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्र सरकारविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्यांच पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितलं.

केंद्र सरकारविरोधात नागरिकांत रोष

शेतीतील उत्पादनाला योग्य किंमत मिळत नाही. इंधन दरवाढीनं सामान्य नागरिक होरपडला जातोय. पेट्रोल, डिझेलच्या दरानं शंभरी पार केली आहे. सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या साऱ्या समस्या पिपरीवासियांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. केंद्र सरकार विरोधात गावात अधिक रोष असल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं. गावातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित केल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दौरा केला. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याकडून नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विजय वडेट्टीवार चक्क गावात पोहचले. शेवटच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळं स्थानिकांमध्ये वडेट्टीवारांबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली.

इतर बातम्या 

कोराडी, खापरखेडा प्रकल्पाचा धोका, हवा-पाणी-माती प्रदूषित, पर्यावरणावर परिणाम

एकाच जागी वीज प्रकल्प नकोत, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, शरद पवार यांचे मत

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली