AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थी युक्रेनमधून आणलेत, फार मोठा तीर मारला नाही; वडेट्टीवारांचा केंद्रावर हल्लाबोल

रशिया-युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाची सर्वाधिक झळ युक्रेनला पोहोचली आहे. युक्रेनमधील अनेक इमारती मिसाईल हल्ल्यात नेस्तनाबूत झाल्या आहेत. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकल्याने त्यांना मायदेशी आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थी युक्रेनमधून आणलेत, फार मोठा तीर मारला नाही; वडेट्टीवारांचा केंद्रावर हल्लाबोल
30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थी युक्रेनमधून आणलेत, फार मोठा तीर मारला नाही; वडेट्टीवारांचा केंद्रावर हल्लाबोलImage Credit source: vijay wadettiwar twitter
| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 11:59 AM
Share

नागपूर: रशिया-युक्रेनमध्ये (Russia Ukraine Crisis) भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाची सर्वाधिक झळ युक्रेनला पोहोचली आहे. युक्रेनमधील अनेक इमारती मिसाईल हल्ल्यात नेस्तनाबूत झाल्या आहेत. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी (indian student) अडकल्याने त्यांना मायदेशी आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत भारताने केवळ 900 विद्यार्थी मायदेशी आणले आहेत. मात्र, त्यातही श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या श्रेयवादाच्या लढाईवर काँग्रेसे नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी खोचक टीका केली आहे. युक्रेनमध्ये 30 हजार विद्यार्थी अडकले आहेत. त्यापैकी फक्त 900 मुलांना परत आणलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने फार मोठा तीर मारला नाही, अशी खोचक टीका करतानाच केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्रावर थेट हल्ला चढवला. युद्धजन्य परिस्थितीत इतर देशांनी आपले नागरिक मायदेशी नेले, आपण मात्र लवकर पावलं उचलली नाही. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची गरज आहे. युक्रेनमध्ये 25 ते 30 हजार मुलं आहेत. 40 किमी प्रवास करून गेल्यानंतर थंडीत ते उघड्यावर झोपले. दोन विमाने आले म्हणजे सर्व विद्यार्थी आले असं होत नाही. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागेल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

ऑपरेशन गंगा वाहून जाता कामा नये

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने घरापर्यंत पोहोचवणार आहोत. केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. ते वाहून जाता कामा नये. केंद्राने प्रत्येक विद्यार्थ्याला परत आणावे. पोलंडचे राजदूत मदत करत नाहीत. त्यांना ताकीद देण्याची गरज आहे. नाटोमध्ये भारतानं समर्थन न केल्याने युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत नाही. याकडे त्वरीत लक्ष घालणं गरजेचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ओबीसी विद्यार्थ्यांची माथी भडकवली जात आहेत

ओबीसी आरक्षणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक आयोगाने याचिका दाखल केली म्हणून सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे. आता बुधवारी ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे. बुधवारी ओबीसींच्या बाजूनं निकाल लागेल अशी आशा आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, पण त्यातुलनेत निधी मिळत नाही. ओबीसी विद्यार्थ्यांचे माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.

राजे स्वयंप्रकाशित होते

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवरायाला कुठल्या गुरुची गरज नव्हती. ते स्वयंनिर्माते होते. राजे स्वयंप्रकाशित होते. त्यांना गुरु लागत नाही. हिमालयात सर्वांना गुरु लागतो. राज्यपाल तिकडे असावेत. त्यांचं विधान शिवरायांचा अपमान करणारे आहे. समर्थ रामदास गुरु असते तर एखादा धडा गुरुवरंही असता, पण सर्व धडे शिवरायांवर आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Russia Ukraine War Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवलेल्या उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात

Russia Ukraine War : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक, यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षेला प्राधान्य

Video : युक्रेनच्या बॉर्डरवर भारतीयांना मारहाण, लाथा, बुक्क्या घालतानाचे व्हिडिओ व्हायरल

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी