AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | नाग नदी केव्हा स्वच्छ होणार? पुन्हा एकदा बदलला डीपीआर, प्रदूषणावर उपाय काय?

नागपूर शहरातून वाहणारी नाग नदी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. शहरातील गडर लाईन्स या नदीत टाकल्या जातात. त्यामुळं कितीही वेळा स्वच्छ केली, तरी नदीचे प्रदूषण काही केल्या कमी होत नाही. गेल्या अकरा वर्षांत अनेकदा डीपीआर बदलण्यात आला.

Nagpur | नाग नदी केव्हा स्वच्छ होणार? पुन्हा एकदा बदलला डीपीआर, प्रदूषणावर उपाय काय?
नवी दिल्ली येथील बैठकीत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 9:43 AM
Share

नागपूर : नागनदी पुनरुज्जीवन (Nagnagi Revival) व संवर्धन प्रकल्पाला 27 ऑक्टोबर 2021 रोजी एक्सपेंडिचर फायनान्स कमिटीची मंजुरी मिळाली होती. वित्त विभागाच्या (Finance Department) एक्सपेंडिचर फायनान्स कमिटीने नाग नदी पुनरुज्जीवन व संवर्धन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होऊ शकते. नाग नदीवरून नागपूर शहराची ओळख आहे. परंतु, हीच नागनदी शहराच्या प्रदूषणास कारणीभूत ठरते. प्रदूषण दूर करणे हे फार मोठे आव्हान आहे. हे आव्हान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी स्वीकारले. या नागनदीतून सीप्लेन उडविण्याचे स्वप्न नितीन गडकरी पाहत आहेत. ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलत आहेत.

आठ वर्षांचा कालावधी लागणार?

नाग नदीतील पाणी स्वच्छ राहावे, यासाठी केंद्र शासनाने नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी दिली होती. नागपूर शहरासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यीकरणात विलक्षण भर पडणार आहे. या कामासाठी आठ वर्षाचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. या अंतर्गत 92 एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प तयार केले जाणार आहेत. 500 किमी सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन, कम्युनिटी टॉयलेट निर्माण केले जाणार आहे.

नितीन गडकरी यांनी केलेले ट्विट

नवी दिल्लीत पार पडली बैठक

नाग नदी सांडपाणी आणि औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक पाण्यामुळे दूषित झाली आहे. या नदीतून वाहणारे सांडपाणी प्रक्रिया करून स्वच्छ करण्यात येणार आहे. नदीतील सांडपाणी, कचरा, नाग नदीला मिळणार्‍या उपनद्या, नाले यातून होणारे प्रदूषण कमी करण्याचे काम केले जाईल. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तातडीने सल्लागार नियुक्त करा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करत कामाला गती द्या, असेही गडकरी यांनी सांगितले. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत नवी दिल्ली येथे जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, जलशक्ती मंत्रालयाचे सचिव पंकज कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जायकाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत पार पडलेल्या बैठकीत ना. गडकरी बोलत होते.

मेडिकलच्या दंत महाविद्यालयात विद्रृप चेहऱ्यांवर होणार उपचार, नागपुरात इम्प्लांट किट्स लवकरच उपलब्ध

सिटी सर्व्हे विभागाची फेरफार अदालत सोमवारी, नागपूर शहरातील नागरिकांची कोणती कामे होणार?

Nagpur | महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यायामशाळेत काढला दम! मनपा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिले संकेत

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.