माझ्या नेत्याने सांगितलं ते गोपनीय, आताच… नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून सस्पेन्स वाढवला

खासदार उन्मेष पाटील यांच्या बंडावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही नाकरल्यावर तिकडे गेलेत ना? पडायला कोणी तरी लागतो ना?, असं नारायण राणे म्हणाले. उन्मेष पाटील हे उद्या भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

माझ्या नेत्याने सांगितलं ते गोपनीय, आताच... नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून सस्पेन्स वाढवला
narayan rane Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 7:43 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजपने अजूनही जाहीर केलेला नाही. या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना या मतदारसंघातून तिकीट देण्याचं घटत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जातंय की काय? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच नारायण राणे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. माझ्या नेत्याने मला जे सांगितलंय ते गोपनीय आहे. आताच सांगणार नाही, असं म्हणत राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचा सस्पेन्स वाढवला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत स्पष्ट विधान केलं. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचाच उमेदवार लढवेल. इथला उमेदवार पक्ष ठरवेल. कुणी लुडबुड करू नये. मी तिकीट मागायला गेलो नाही. बातम्या देताना विचार करा. माझं नाव जाहीर झाल्यास मी निवडणूक लढवले आणि जिंकेल. कुणीही बैठक, मेळावा बोलवू देत, काही होत नाही. दहीकाला प्रमाणे बैठक होत राहतात, शंकासुर कोण असेल माहीत नाही. आम्ही मतदारसंघ सोडणार नाही. त्यांची (किरण सामंत) यांची माहिती घ्या, असं नारायण राणे म्हणाले.

उमेदवारी मिळाली की जिंकेल

मला उमेदवारी मिळाली तर मी लढवले आणि जिंकेल. मला राजकारणात 56 वर्षे झाली आहेत. मला कुणी काहीही सांगितलेलं नाही. माझ्या पक्षाची ताकद मला माहीत आहे. मतदारसंघाचा माझा अभ्यास आहे. मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना सांगितलं की, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार. माझ्या नेत्यांनी मला काय सांगितलं ते गोपनीय आहे. आताच मी सांगणार नाही, असं राणे म्हणाले. तसेच उद्यापर्यंत रत्नागिरी- सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कामधंदा न करता मर्सिडीज घेऊन कसे फिरता?

भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमच्या विजयाची आम्हाला खात्री आहे. आम्ही 400 पार करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी पैसे घेऊन तिकिटे दिल्याची यादी माझ्याकडे आहे. काही लोकांना एके दिवशी पत्रकार परिषदेत आणून हे मी सांगेन. शंकर कांबळी प्रकरणात देखील हे झालं होत. जिंदाल नावाच्या उद्योगपतींकडून 50 लाख रुपये घेऊन तिकीट अचानक देण्यात आले होते. कामधंदा न करता हे मर्सिडीज घेऊन कसे फिरतात? यांची चौकशी होणार. यांना आम्ही सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

तू लवकर तडीपार होणार

भारताचं दरडोई उत्पन्न 1 लाख 97 हजार झालं आहे. संरक्षण बजेट पूर्वी 2 लाख 24 हजार कोटी होतं. आता 5 लाख 94 हजार कोटी आहे हे देश सुरक्षित असण्याचं कारण आहे. देशाचा जीडीपी अनेक देशांच्या पुढे आहे हे उद्धव ठाकरेंनी बघावं. आमच्या नेत्याने केलेलं काम बघ. जनता तुला तडीपार करेल. तू मोदींना तडीपार बोलू नकोस. तू लवकरच तडीपार होणार आहेस, असा हल्लाच त्यांनी चढवला.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.