AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी, उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं?; नारायण राणेंचा सवाल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या दोघांनाही शेतीतलं काय कळतं? असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला. (narayan rane slams rahul gandhi and cm uddhav thackeray )

राहुल गांधी, उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं?; नारायण राणेंचा सवाल
नारायण राणे, भाजप नेते
| Updated on: Jan 07, 2021 | 2:31 PM
Share

कणकवली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या दोघांनाही शेतीतलं काय कळतं? असं विचारतानाच कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो, हे तरी यांना माहीत आहे का? असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला. (narayan rane slams rahul gandhi and cm uddhav thackeray )

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भाजपने सिंधुदुर्गात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. गेल्या सत्तर वर्षांमध्ये जे काँग्रेसला जमलं नाही. ते मोदींनी करून दाखवलं. ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही तिच काँग्रेस आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना पिकवलेला माल विकायलाही बंधने होती. तोट्यात माल विकला जायचा. मेहनतीचा पैसाही त्यांना मिळत नव्हता. सत्तर वर्षातील हे नियम मोदींनी मोडून काढले. आज त्यालाच काँग्रेसने विरोध सुरू केला आहे, अशी टीका राणे यांनी केली.

हे राजकीय आंदोलन

काँग्रेसने काही दलालांना फूस लावून शेतकरी आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेसने दलालांना कामाला लावलं आहे. हे राजकीय आंदोलन आहे. त्यामुळे त्यात सेटलमेंट होईल असं वाटत नाही, असं राणे म्हणाले. राहुल गांधींना शेतीतलं काय कळतं. ते काय बोलतात हे त्यांना कळतं का? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्यांना शेतीतलं काय कळतं? कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो? हे तरी यांना माहीत आहे का? असा सवालही त्यांनी केला. भाजप शेतकऱ्यांसाठी विधायक कामं करत आहे. भाजपच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो, असंही ते म्हणाले.

विमानतळाशी तुमचा काय संबंध?

येत्या 26 जानेवारी रोजी चिपी विमानतळ सुरू करणार असल्याचं शिवसेनेचे खासदार सांगत आहेत. त्यांचा आणि विमानतळाचा काय संबंध? असा सवाल करतानाच आम्ही 2014 रोजीच विमानतळ सुरू केलं आहे, असंही ते म्हणाले. (narayan rane slams rahul gandhi and cm uddhav thackeray )

संबंधित बातम्या:

नामांतराबाबत चर्चेतून मार्ग काढू; ‘त्या’ ट्विटची शहानिशा करू: अजित पवार

शरद पवारांच्या उपस्थितीत सेनेचे कोठे राष्ट्रवादीत जाणार, उद्धव ठाकरे आता काय करणार?

नितीन गडकरी ‘सरां’च्या भेटीला, मनोहर जोशींना वाकून नमस्कार

(narayan rane slams rahul gandhi and cm uddhav thackeray )

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.