गुन्हेगारांच्या नाड्या आवळणारे पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासाठी नाशिककर एकवटले

गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख निर्माण करणारे नाशिक ग्रामीणचे पोलीस (Nashik Police) अधीक्षक सचिन पाटील यांची बदली (Cancel the transfer) रद्द करावी, अशी मागणी सामान्यांतून जोर धरत आहे. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, शनिवारी महापालिकेने (Municipal Corporation) हे बॅनर काढून टाकले.

गुन्हेगारांच्या नाड्या आवळणारे पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासाठी नाशिककर एकवटले
सचिन पाटील
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 6:12 PM

नाशिकः गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख निर्माण करणारे नाशिक ग्रामीणचे पोलीस (Nashik Police) अधीक्षक सचिन पाटील यांची बदली (Cancel the transfer) रद्द करा, अशी मागणी सामान्यांतून जोर धरत आहे. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, शनिवारी महापालिकेने (Municipal Corporation) हे बॅनर काढून टाकले. (Cancel the transfer of Nashik Rural Superintendent of Police Sachin Patil, demand of citizens, banner hoisted in Nashik)

वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्याकडून सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र, एक दिवसापूर्वी त्यांच्या बदलीचा आदेश येऊन धडकला. त्यांंच्या जागी शहाजी उमाप यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुका, आचारसंहिता आणि न्यायालयीन आदेशाप्रमाणे या बदल्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सचिन पाटील यांना येऊन फक्त एक वर्ष झाले आहे. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकालही पूर्ण झाला नाही. मग त्यांच्या बदलीचे कारण काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः पाटील यांच्या बदलीने गावागावातील नागरिक नाराज झाला आहे.

काय केली कामगिरी?

नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक म्हणून रुजू होताच पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली. जिल्ह्यात रेव्ह पार्ट्या, हुक्का पार्टी, अवैध गुटखा प्रकरणांमध्ये पाटील यांनी केलेली कारवाई गाजली. त्यांनी रोलेट किंगचा पर्दाफाश केला. अवघ्या काही महिन्यांत पाटील यांनी केलेल्या कामगिरीमुळे जनसामान्यांत त्यांची गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओखळ झाली होती. शेतकऱ्यांना फसविणारा व्यापारी वर्ग, रोलेटचा जुगार चालविणारे, भूमाफिया या साऱ्यांना पाठिशी घालणारे राजकारणी यांच्या नाड्या पाटील यांनी आवळल्या होत्या. पाटील यांच्या कार्याकाळात गुन्हाचा छडा लवकर लागत असे. त्यामुळेच त्यांची बदली केल्याचा आरोप होत आहे.

भुजबळांनाही साकडे

पाटील यांची बदली रद्द करावी, यासाठी ‘आम्ही सारे शेतकरी, सामान्य नाशिककर’ मंचतर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना नुकतेच निवेदनही देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सचिन पाटील यांच्या बदलीमागे शेतकऱ्यांना फसविणारी चांडाळ चौकडी, रोलेटचा जुगार चालविणारे, अवैध धंदे चालक, गुटखा आणि रेती, भूमाफिया आहेत. या अवैध प्रवृत्तींना अभय देणारे राजकारणी आहेत. त्यांची बदली रद्द करण्यात यावी.’ (Cancel the transfer of Nashik Rural Superintendent of Police Sachin Patil, demand of citizens, banner hoisted in Nashik)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये फक्त वीस रुपयांसाठी कटरने गळा चिरला, अर्ध्या किमीपर्यंत रक्ताचे डाग

नाशिक पालिकेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, 7109 ऑक्सिजन बेड ठेवले सज्ज

हिरव्यागच्च झाडाचा बहर गळून पडला, सुलोचना महानोर यांचे निधन

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.