AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यावं; नितेश राणे यांच्या टीकेला वरूण सरदेसाई यांचं एका वाक्यात उत्तर

Varun Sardesai on Nitesh Rane : आदित्य ठाकरेंनी संधी दिली म्हणून युवा नेते झाले अन् आता...; राहुल कनाल यांच्यावर वरूण सरदेसाई यांचा घणाघात

क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यावं; नितेश राणे यांच्या टीकेला वरूण सरदेसाई यांचं एका वाक्यात उत्तर
| Updated on: Jun 30, 2023 | 3:09 PM
Share

नाशिक : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यावर ठाकरे गटाचे युवा नेते वरूण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांना वेगवेगळ्या संध्या देण्यात आल्या. आदित्य ठाकरे यांनी संधी दिली म्हणून ते युवानेते झाले. नेते झाले म्हणून अन्याय झाला का? आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करावे म्हणून कमी लोकांना संधी मिळते. म्हणून महत्वकांक्षा वाढते, असं म्हणत वरूण सरदेसाई यांनी भाष्य केलंय.

भाजपचे नेते नितेश राणे यांनी वरूण सरदेसाई यांना टोला लगावला आहे. जस उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी आहे. तसं वरूण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील शकुनी आहे, असं नितेश राणे म्हणालेत. त्याला वरूण सरदेसाई यांनी उत्तर दिलं आहे.

क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायचं. ज्याला जे बोलायचे असते, ते बोलुद्या… कुणी उठून काहीही बोलेल, सगळ्याच गोष्टींना उत्तरं नसतात द्यायची, असं ते म्हणालेत.

उद्या मोर्चा निघणारच!

उद्या शिवसेना आणि युवसेना मुंबई महापालिकेवर मोर्चा काढत आहे. हा महामोर्चा आहे, त्यात शिवसैनिक आणि सामान्य नागरिक सुद्धा सहभागी होणार आहेत. एकही निवडणूक घेतली जात नाहीये. आदित्य ठाकरे एक एक घोटाळा बाहेर काढत आहेत. म्हणून भाजप ही मोर्चा काढत आहे, पण तो त्यांचा निर्णय, असं वरूण सरदेसाई म्हणालेत.

ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने झाडाझडती घेतली. त्यावर बोलताना, सूरज हे माझे जवळचे सहकारी आहेत. शिवसेनेचे निष्ठावंत वाघ आहेत. ते चौकशीला सामोरे जात आहेत. संघटनेचं काम देखील सुरू आहे. भाजपवर जे बोलत आहे, त्यांच्यावर धाडी पडत आहे, असं म्हणत वरूण यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार का नाही?

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावर बोलताना एक वर्ष सरकार येऊन झालं. वर्षे होऊन सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही हे त्यांचं अपयश आहे. एकाला मंत्रिपद दिलं तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयारआहेत. वर्ष कशाला लागत आहे. वेगवेगळ्या तारखा देत आहे. काहींचे सुट कपाटमध्ये आहेत, ते खराब झालेत. मग मंत्रिमंडळ विस्तार का नाही, असा सवाल वरूण यांनी विचारला आहे.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......