आसूडगावातील गणेश भक्तांनी साकारला नवी मुंबई विमानतळाचा देखावा, भूमिपुत्र गणेशभक्त दी बा पाटील यांच्या नावावर ठाम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आला होता.

आसूडगावातील गणेश भक्तांनी साकारला नवी मुंबई विमानतळाचा देखावा, भूमिपुत्र गणेशभक्त दी बा पाटील यांच्या नावावर ठाम
आसूडगावातील गणेश भक्तांनी साकारला नवी मुंबई विमानतळाचा देखावा
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 10:03 PM

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त ठाम असल्याचे आजही पाहायला मिळत आहे. सध्या गणेशोत्सव सुरू झालेला आहे. दरम्यान गणपती बापाची सजावट म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देखावे बनवण्यात आलेले आहेत. आसूडगाव येथील माजी सरपंच विजय भोपी यांनी देखील घरगुती गणेशाची आरास दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फलक असलेला देखावा साकारलेला आहे. विमानतळ ज्या ठिकाणी उभारले जाणार आहे, त्या ठिकाणचे हुबेहूब चित्र आपल्याला पाहायला मिळते. देखावा पाहिला तर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आपल्या भूमिकेवर आजही ठाम आहे हे सिद्ध होते. (Ganesh devotees from Asudgaon realize the scene of Navi Mumbai Airport)

काय म्हणाले विजय भोपी?

विजय भोपी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गणपती बाप्पा विघ्नहर्ता, बुध्दीचा देवता आहे. आणि बाप्पा या महाराष्ट्रामधील उद्धव ठाकरे सरकारला सदबुध्दी देईल आणि नवी मुंबई विमानतळाला नाव दि. बा. पाटील हेच दिले जाईल, हाच देखावा साकारण्याचा मुख्य उद्देश आहे. पुढे ते म्हणतात, नवी मुंबईतला आगरी समाज जमिनी जाऊनही आपल्या भूमीवर राहताना दिसतोय, ते केवळ दि. बा. पाटील या नेत्यामुळे आहे. विकसित भूखंडाची योजना दिबांनी त्यावेळी सरकारला मानायला लावली नसती, तर आज इथला प्रकल्पग्रस्त दूर कुठेतरी फेकला गेला असता. इथल्या लोकांमध्ये दिबांबद्दल असलेला जिव्हाळा यातून निर्माण झालाय. आपल्या भाकरीवर दिबांचं नाव असल्याची जाणीव असल्यानं विमानातळाला त्यांच्या नावाचा होत असलेला आग्रह दिसून येतो.

विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्याची मागणी जोर धरतेय

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आला होता. विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यावे असे भूमिपूत्रांचे ठाम मत असतानाही राज्य सरकार याची दखल घेत नाही. त्यामुळे कृती समितीने मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला होता. (Ganesh devotees from Asudgaon realize the scene of Navi Mumbai Airport)

इतर बातम्या

साकीनाका बलात्कार प्रकरणी गृह विभागाची महत्त्वाची बैठक, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा? दिलीप वळसे पाटील म्हणतात…

बंपर ऑफर आणि धमाकेदार फीचर्ससह Realme 8s 5G बाजारात

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.