AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवारांचा विद्यार्थ्यांशी संवाद, म्हणाले….

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर पहिल्यांदाच शरद पवार आज माध्यमांसमोर आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवारांचा विद्यार्थ्यांशी संवाद, म्हणाले....
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 07, 2024 | 4:59 PM
Share

नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण करताना माजी पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरु यांच्यावर टीका केली. त्यावर शरद पवारांनी मत मांडलं. “पंतप्रधान कोणत्या एका पक्षाचा नसतो, देशाचा असतो. जवारलाल नेहरु यांनी देशाला प्रजासत्ताकच्या दिशेला नेलं. देशाचा चेहरा बदलण्यसाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञानात नेहरुंनी चांगलं काम केलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. नेहरूंनी देशाचा चेहरा बदलण्याचं काम केलं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत”, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांचा दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणातील जे संवाद होते त्यामध्ये जवारलाल नेहरु यांच्यावर टीका होती. ते ऐकून दु:ख झालं. हे बरोबर नाही. ज्यांनी देशासाठी काम केलं त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करु शकत नाहीत. मग ते जवाहरलाल नेहरु असतील, लाल बहादुर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील त्यांनी देशासाठी अमूल्य असं योगदान दिलं आहे. पंतप्रधानांचं आजचं भाषण ऐकून दु:ख झालं. नेहरुचं योगदान नाकारता येणार नाही”, असं मत शरद पवारांनी मांडलं.

‘अहिंसेने उत्तर द्यावं लागेल’

यावेळी एका विद्यार्थ्याने महत्त्वाचा प्रश्न विचारला. काही तरुण चुकीच्या गोष्टींच्या विरोधात येतात तेव्हा त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा काय करावं? असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारला. त्यावर शरद पवार यांनी सविस्तर भूमिका मांडली. “जे तरुण आपलं मत मांडायला पुढे येतात, संघर्ष करायला पुढे येतात त्याच्यावर वैयक्तिक हल्ला केला जातो. याची सुरुवात दिल्ली विद्यापीठातून सुरु होते. आता हा प्रकार फक्त दिल्ली विद्यापीठापर्यंत मर्यादीत राहिलेला नाही. इतर विद्यापीठांमध्येही हा प्रकार घडायला लागला आहे. सांप्रदायिक शक्ती वाढत आहे. त्यांच्या विरोधात संघटन उभं करावं लागेल. अहिंसेने उत्तर द्यावं लागेल”, असं शरद पवार म्हणाले.

‘सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय’

“जे सुरू आहे ते अतिशय वाईट सुरु आहे. झारखंडमधील मुख्यमंत्री जे एक वेगळी भूमिका घेत होते. सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. असहिष्णुता आहे. आपल्याला एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल”, असं मत शरद पवार यांनी मांडलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.