AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी मोदींना प्रश्न विचारला असता, पण त्यांची… शरद पवार यांनी काढला चिमटा; नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा सुरू आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यासाठी महत्त्वाच्या जागांवर मतदान होणार आहे, त्यामुळे मोदी राज्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदीच नव्हे तर अमित शाह आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे. तसेच विविध विषयांवर भाष्यही केलं आहे.

मी मोदींना प्रश्न विचारला असता, पण त्यांची... शरद पवार यांनी काढला चिमटा; नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Apr 20, 2024 | 12:46 PM
Share

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राम मंदिराच्या मूर्तीवरून टीका केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात रामासोबत सीतामाई का नाही? असा सवाल शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर पवार यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. त्यावर पवार यांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. मला एका सभेत प्रश्न विचारण्यात आला, रामाची मूर्ती बसवली पण सीतेची का नाही? मी मोदींना प्रश्न विचारला असता पण त्यांची व्यक्तिगत अडचण आहे, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा चिमटा काढलाय. भाजपच्या 400 पारच्या घोषणेवरही त्यांनी टीका केली. मला भाजपचा हा नारा चुकीचा वाटतो. लोकसभेची संख्या 543 सांगितली तर मी खरी मानणार, असं शरद पवार म्हणाले. दहा वर्षात शरद पवार यांनी काय केलं? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. त्यालाही पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. मी 10 वर्ष सत्तेत नव्हतो. सत्तेत ते होते. 10 वर्षात त्यांनी काय केलं हे सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे. माझ्याकडे शेती खातं होतं तेव्हा मी काय केलं हे जगाला माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आमचा भर विधानसभेवर

मागच्या निवडणुकीत विरोधकांना सहा जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत 50% जागा महाविकासला आघाडीला मिळणार आहेत. महाविकास आघाडीत जागांबाबत एक वाक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या कमी जागा घेतल्या. कारण आमचं लक्ष विधानसभा निवडणुकीवर आहे. विधानसभेत अधिक जागा मिळवणं आणि अधिक सहकारी लोकसभेत पाठवणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं सांगतानाच सध्या महाविकास आघाडीसाठीचं वातावरण अनुकूल आहे, असं पवार म्हणाले.

किंमत मोजावी लागत आहे

धनगर आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं. धनगर समाजाला सवलती मिळण्याचा अधिकार आहे, हे आम्ही सातत्याने सांगत होतो. पहिल्या बैठकीत आरक्षण देऊ असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन दिला होता. त्याचं काय झालं? आज 8 वर्ष झाली. ते सत्तेत आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण दिले होते. अजूनही दिलं नाही. धनगर समाजाला मुंबई आणि दिल्लीत न्याय मिळत नाही. राज्य सरकारने चुकीची बाजू मांडली. त्याची किंमत गरीब धनगर समाजाला मोजावी लागत आहे, असं ते म्हणाले.

त्या निर्णयाला संमती नव्हती

शरद पवार हे भाजपसोबत जाण्यास अनुकूल होते, असं अजित पवार यांच्याकडून वारंवार सांगितलं जात आहे. अजितदादांच्या या दाव्यावरही त्यांनी भाष्य केलं. भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला आमची संमती नव्हती, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!