AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही”; अवकाळीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची जाण असेल तर अब्दुल सत्तार त्यांच्याकडून खुलासा मागून घेतील आणि शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्य विषयी त्यांनी माफी मागायला पाहिजे अशी मागणीही त्यांन यावेळी केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही; अवकाळीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला
| Edited By: | Updated on: Mar 13, 2023 | 4:25 PM
Share

भुसावळ : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच कांदा, गहू, हरभरा आणि मूग आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे अवकाळी पावसाचे संकट तर दुसरीकडे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः पिकावर नांगर फिरवला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मुंबई आणि ठाण्या पलीकडे पाहायला त्यांना वेळ नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास त्यांना वेळ नाही अशी सडकून टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ज्या संकटात कापूस उत्पादक सापडला आहे. त्या संकटातून कांदा उत्पादक यांची ते सुटका करू शकले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे प्रश्नही ते सोडवू शकले नाहीत अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

तर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्त केले होते. त्यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, सरकारमध्ये येण्यापूर्वी-आणि सरकारमध्ये आल्यानंतर त्यांच्या वक्तव्यामध्ये फार मोठे अंतर पडले असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

शेतकरी आत्महत्या पूर्वी करत होते आणि आताही करता हे या प्रकारचे त्यांचे वक्तव्य म्हणजे अब्दुल सत्तारांनी एक प्रकारे शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करण्यासारखं आहे अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे हे या सरकारकडून अपेक्षित असताना मात्र सरकारमधील मंत्रीच जर असं वक्तव्य करत असतील तरी अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची जाण असेल तर अब्दुल सत्तार त्यांच्याकडून खुलासा मागून घेतील आणि शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्य विषयी त्यांनी माफी मागायला पाहिजे अशी मागणीही त्यांन यावेळी केली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.