AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही”; अवकाळीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची जाण असेल तर अब्दुल सत्तार त्यांच्याकडून खुलासा मागून घेतील आणि शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्य विषयी त्यांनी माफी मागायला पाहिजे अशी मागणीही त्यांन यावेळी केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही; अवकाळीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला
| Edited By: | Updated on: Mar 13, 2023 | 4:25 PM
Share

भुसावळ : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच कांदा, गहू, हरभरा आणि मूग आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे अवकाळी पावसाचे संकट तर दुसरीकडे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः पिकावर नांगर फिरवला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मुंबई आणि ठाण्या पलीकडे पाहायला त्यांना वेळ नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास त्यांना वेळ नाही अशी सडकून टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ज्या संकटात कापूस उत्पादक सापडला आहे. त्या संकटातून कांदा उत्पादक यांची ते सुटका करू शकले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे प्रश्नही ते सोडवू शकले नाहीत अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

तर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्त केले होते. त्यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, सरकारमध्ये येण्यापूर्वी-आणि सरकारमध्ये आल्यानंतर त्यांच्या वक्तव्यामध्ये फार मोठे अंतर पडले असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

शेतकरी आत्महत्या पूर्वी करत होते आणि आताही करता हे या प्रकारचे त्यांचे वक्तव्य म्हणजे अब्दुल सत्तारांनी एक प्रकारे शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करण्यासारखं आहे अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे हे या सरकारकडून अपेक्षित असताना मात्र सरकारमधील मंत्रीच जर असं वक्तव्य करत असतील तरी अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची जाण असेल तर अब्दुल सत्तार त्यांच्याकडून खुलासा मागून घेतील आणि शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्य विषयी त्यांनी माफी मागायला पाहिजे अशी मागणीही त्यांन यावेळी केली.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.