AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane: औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही ते ठरवा; नितेश राणेंचा संभाजी छत्रपतींना सवाल

Nitesh Rane: मराठा समाज संघटीत होत नाही ही तक्रार आहे. त्यावेळचा काळ वेगळा होता. अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर त्यावेळी तलवार उचलावी लागत होती.

Nitesh Rane: औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही ते ठरवा; नितेश राणेंचा संभाजी छत्रपतींना सवाल
औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही ते ठरवा; नितेश राणेंचा संभाजी छत्रपतींना सवालImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 6:11 PM
Share

कुडाळ: औरंगजेबाच्या कबरीवरून (aurangzeb tomb)वाद सुरू झालेला असतानाच राज्य सरकारने (maha vikas aghadi) पाच दिवसांसाठी औरंगजेबाच्या कबरीवर येण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही या कबरीवरून सवाल केला आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांना आपण दोन पायावर जाऊ देतो हीच आपली शोकांतिका आहे. संभाजी महाराजांना ज्यांनी तडफडून मारलं त्यांची कबर महाराष्ट्रात कशाला हवी? पुरातन खातं विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीला प्रतिसाद देत नाही. परंतु औरंगजेबाची कबर काही घडू नये म्हणून पाच दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवतात. कशी माणसे या खात्यात आहे बघा, असा संताप नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. मीडियाशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हा सवाल केला. तसेच कबरीवर पर्यटकांना येण्यास मज्जाव करण्याऐवजी कबर ठेवताच कशाला? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही हे संभाजी छत्रपती यांनी ठरवावं, असा खोचक सवालही त्यांनी केला.

नितेश राणे यांनी यावेळी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. मराठा समाज संघटीत होत नाही ही तक्रार आहे. त्यावेळचा काळ वेगळा होता. अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर त्यावेळी तलवार उचलावी लागत होती. आपली आता लढाई आर्थिक उन्नतीसाठी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अख्ख्या राज्यात मी आणि कोंढरे साहेब फिरलो. अण्णासाहेब महामंडळाची आज काय स्थिती आहे? सारथीला निधी उत्पन्न करून दया म्हणून वारंवार मागणी करतोय, असं नितेश राणे यांनी सांगितलं. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. दुसरा कुठला समाज आहे? असा सवाल त्यांनी केला.

फक्त शिवाजी महाराज एकत्र आणू शकतात

रत्नागिरीतील एका कार्यक्रमावरही त्यांनी मिश्किल टीका केली. या कार्यक्रमाची पत्रिका पाहिली त्यावर विनायक राऊत, वैभव नाईक, नितेश राणे हे एका व्यासपीठावर येणार असं दिसलं. एकमेकांची तोंडेही न बघणाऱ्या लोकांना फक्त शिवाजी महाराजच एकत्र आणू शकतात, असंही ते म्हणाले.

संभाजीराजेंनी ठरवावं

दरम्यान, संभाजी छत्रपती यांना राज्यसभेसाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेचा पाठिंबा मिळावा म्हणून संभाजी छत्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरिता वर्षा निवासस्थानी गेले आहेत. त्यावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिलं. त्यांच्यासोबत जायचं की नाही ते संभाजीराजेंनी ठरवावं, असा टोला त्यांनी लगावला आहे.

औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद शहरात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला धोका निर्माण झाल्यामुळे सध्या पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर पाच दिवसांकरता कबर बंद सुद्धा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कबरीच्या पाठीमागच्या बाजूने सुद्धा कबरीला सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी प्रशासन घेत आहे.

तर आणखी पाच दिवस कबर बंद

औरंगजेबाची कबर पाच दिवसंकरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाने कबर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कबर परिसरात वातावरण बिघडण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती न सुधारल्यास आणखी पाच दिवस कबर बंद राहणार आहे. आज सकाळपासून औरंगजेबाची कबर बंद करण्यात आली आहे.

दादर स्टेशनवरील 'चालता-फिरता इंडिकेटर'! प्रवाशांसाठी निस्वार्थ सेवा
दादर स्टेशनवरील 'चालता-फिरता इंडिकेटर'! प्रवाशांसाठी निस्वार्थ सेवा.
सोलापुरात अवकाळीचा फटका: टोमॅटो, ज्वारी, गहूसह अनेक पिके उद्ध्वस्त
सोलापुरात अवकाळीचा फटका: टोमॅटो, ज्वारी, गहूसह अनेक पिके उद्ध्वस्त.
अकोलेतून लाल वादळ अहिल्यानगरच्या दिशेने रवाना होणार!
अकोलेतून लाल वादळ अहिल्यानगरच्या दिशेने रवाना होणार!.
जय पवारांकडून अजितदादांच्या जुन्या फोटोंचा 'तो' व्हिडीओ पोस्ट
जय पवारांकडून अजितदादांच्या जुन्या फोटोंचा 'तो' व्हिडीओ पोस्ट.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे बारामतीची धुरा! पोटनिवडणूक लढवणार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे बारामतीची धुरा! पोटनिवडणूक लढवणार.
मोहोर आलेल्या आंब्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव! शेतकरी संकटात
मोहोर आलेल्या आंब्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव! शेतकरी संकटात.
दादांचा विमान अपघात, झारखंड घटनेची चौकशी व्हावी; सुळेंची मागणी
दादांचा विमान अपघात, झारखंड घटनेची चौकशी व्हावी; सुळेंची मागणी.
जमीन वादाच्या आरोपांवरून मंत्री भुमरे दानवेंवर संतापले! म्हणाले...
जमीन वादाच्या आरोपांवरून मंत्री भुमरे दानवेंवर संतापले! म्हणाले....
चार दिवसांच्या उपचारानंतर शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज
चार दिवसांच्या उपचारानंतर शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज.
राज्यसभेवर कोण जाणार हे...; संजय राऊतांनी स्पष्टच सांगून टाकलं
राज्यसभेवर कोण जाणार हे...; संजय राऊतांनी स्पष्टच सांगून टाकलं.